Elvish Yadav Reply : एल्विश यादव म्हणतो, 'तो मी नव्हेच'!

गुन्हा दाखल झाल्यानतंर एल्विश सोशल मीडियावर व्यक्त झाला...


नोएडा : बिग बॉस ओटीटी २चा (Bigg Boss OTT 2) विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) ड्रग्ज पार्ट्यांमध्ये (Drugs parties) विषारी सापांचं विष पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. क्लब आणि पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट (Snake Bite) देण्यासह अनेक गंभीर आरोप करत एल्विशविरोधात नोएडामध्ये (Noida) एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. मात्र, एल्विश पोलिसांच्या हाती लागला नाही.


मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर या संस्थेने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली व एल्विशवर गंभीर आरोप केले होते. ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी एफआयआर दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर ४९ मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा सापाबरोबर सापाचे विषही जप्त केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी एल्विशच असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते.


दरम्यान, या प्रकरणी एल्विशने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं तो या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे. त्याने म्हटले आहे, मी आज सकाळी उठल्यावर पाहिलं की, माझ्याबाबत कशा प्रकारच्या बातम्या पसरत आहेत आणि काय आरोप होत आहेत की एल्विशने नशिल्या पदार्थांची विक्री केली आहे, एल्विशला अटक झाली आहे वगैरे वगैरे. पण माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहेत, खोटे आहेत. यात एक टक्काही सत्यता नाही, असं तो म्हणाला.


पुढे त्याने म्हटले आहे की, मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसंच मी पोलीस, प्रशासन, माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी या सगळ्यांना एक विनंती करु इच्छितो की या प्रकरणात माझा एक टक्का जरी सहभाग आढळला तर मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मी मीडियाला विनंती करतो की, त्यांना जोपर्यत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यत माझी बदनामी करु नये. या आरोपांशी माझं काही देणंघेणं नाही, असं एल्विशने या व्हिडीओत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता काय नवं वळण मिळणार हे पाहावं लागणार आहे.




Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर