shubman gill: डेंग्यूमुळे शुभमन गिलचे घटले होते ४ किलो वजन, कशी केली दमदार कामगिरी

  236

मुंबई: भारताने श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक २०२३मधील ३३व्या सामन्यात खूपच वाईट पद्धतीने हरवले. टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३०२ धावांनी विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.


शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला. मी नर्व्हस नाही आहे. मी सुरूवात माझ्या हिशेबाने करतो. डेंग्यूमुळे माझे वजन ४ किलोनी कमी झाले. मी पूर्णपणे फिट नाही. आपल्या खेळीबद्दल सांगताना गिल म्हणाला, मी गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेले सामने सोडले तर सर्वच सामन्यात चांगली सुरूवात मिळाली होती. आज काही बॉल सीम करत होते मी ते हिट केले. आम्ही चांगला परफॉर्म करून ३५० धावा केल्या.


भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करताना ८ बाद ३५७ धावा केल्या. यात शुभमन गिलने ९२ धावांची शानदार खेळी केली. शुभमनने ९२ बॉलचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ९४ बॉलमध्ये ८८ धावा केल्या.


कोहली आणि शुभमन यांच्या मोठी भागीदारी रचली गेली. अय्यरनेही ८२ धावा ठोकल्या. यात त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. रवींद्र जडेजाने ३५ धावांचे योगदान दिले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी