मुंबई: भारताने श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक २०२३मधील ३३व्या सामन्यात खूपच वाईट पद्धतीने हरवले. टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३०२ धावांनी विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला. मी नर्व्हस नाही आहे. मी सुरूवात माझ्या हिशेबाने करतो. डेंग्यूमुळे माझे वजन ४ किलोनी कमी झाले. मी पूर्णपणे फिट नाही. आपल्या खेळीबद्दल सांगताना गिल म्हणाला, मी गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेले सामने सोडले तर सर्वच सामन्यात चांगली सुरूवात मिळाली होती. आज काही बॉल सीम करत होते मी ते हिट केले. आम्ही चांगला परफॉर्म करून ३५० धावा केल्या.
भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करताना ८ बाद ३५७ धावा केल्या. यात शुभमन गिलने ९२ धावांची शानदार खेळी केली. शुभमनने ९२ बॉलचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ९४ बॉलमध्ये ८८ धावा केल्या.
कोहली आणि शुभमन यांच्या मोठी भागीदारी रचली गेली. अय्यरनेही ८२ धावा ठोकल्या. यात त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. रवींद्र जडेजाने ३५ धावांचे योगदान दिले.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…