shubman gill: डेंग्यूमुळे शुभमन गिलचे घटले होते ४ किलो वजन, कशी केली दमदार कामगिरी

मुंबई: भारताने श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक २०२३मधील ३३व्या सामन्यात खूपच वाईट पद्धतीने हरवले. टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३०२ धावांनी विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.


शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला. मी नर्व्हस नाही आहे. मी सुरूवात माझ्या हिशेबाने करतो. डेंग्यूमुळे माझे वजन ४ किलोनी कमी झाले. मी पूर्णपणे फिट नाही. आपल्या खेळीबद्दल सांगताना गिल म्हणाला, मी गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. गेले सामने सोडले तर सर्वच सामन्यात चांगली सुरूवात मिळाली होती. आज काही बॉल सीम करत होते मी ते हिट केले. आम्ही चांगला परफॉर्म करून ३५० धावा केल्या.


भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी करताना ८ बाद ३५७ धावा केल्या. यात शुभमन गिलने ९२ धावांची शानदार खेळी केली. शुभमनने ९२ बॉलचा सामना करताना ११ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ९४ बॉलमध्ये ८८ धावा केल्या.


कोहली आणि शुभमन यांच्या मोठी भागीदारी रचली गेली. अय्यरनेही ८२ धावा ठोकल्या. यात त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. रवींद्र जडेजाने ३५ धावांचे योगदान दिले.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत