मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराज आणि शमीने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
भारताने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी हरवले. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १९.४ षटकांत ५५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या.
सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. संघासाठी शुभमन गिलने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली तर विराट कोहलीने ८८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने ५ खेळाडूंना आपली शिकार बनवली.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाची सुरूवात डळमळीत झाली. तीन धावांत त्यांनी तीन विकेट पडले. त्यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत होते. मोहम्मद शमीने पाच विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडली. तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…