World cup 2023: शमी, सिराजने मोडले श्रीलंकेचे कंबरडे, भारत दिमाखात सेमीफायनलमध्ये

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराज आणि शमीने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.


भारताने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी हरवले. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १९.४ षटकांत ५५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या.


सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. संघासाठी शुभमन गिलने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली तर विराट कोहलीने ८८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने ५ खेळाडूंना आपली शिकार बनवली.


दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाची सुरूवात डळमळीत झाली. तीन धावांत त्यांनी तीन विकेट पडले. त्यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत होते. मोहम्मद शमीने पाच विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडली. तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या