World Cup 2023: आज पाकिस्तान करणार भारताच्या विजयाची प्रार्थना

मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये सेमीफायनलची शर्यत आता अधिकच रंजतदार होत चालली आहे. द. आफ्रिका आणि भारतीय संघ १२-१२ गुणांसग सेमीफायनलमध्ये पोहोचले आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आता बाकी ७ संघांमध्ये चुरस लागली आहे.


बांगलादेशचा संघ आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. मात्र यातच पाकिस्तानचा संघ हळूहळू सेमीफायनलसाठी आपला रस्ता शोधत आहे. दरम्यान, त्यांची सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. त्याला आपले सामने जिंकण्यासोबतच भारत आणि अफगाणिस्तानसह इतर संघाच्या विजय-पराभवावर अवलंबून राहावे लागेल.



श्रीलंकेला हरवताच भारत सेमीफायनलमध्ये


आज भारताचा महत्त्वाचा श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी २ वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान पक्के होईल. मात्र श्रीलंकेला आपला गाशा गुंडाळावा लागेल.


अशातच पाकिस्तानचा संघ भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. श्रीलंका स्पर्धेबाहेर गेल्यास पाकिस्तान सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊळ टाकेल. याआधी १ नोव्हेंबरला द. आफ्रिकाने न्यूझीलंडला १९० धावांनी हरवत पाकिस्तानला जबरदस्त मदत केली. न्यूझीलंडच्या हरण्याने पाकिस्तानला मोठा फायदा झाला.


पाकिस्तानचे चाहते प्रार्थना करत आहेत की न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघानी आपले सामने गमावावेत. तसेच पाकिस्तानला आपले उरलेले दोनही सामने जिंकणे गरजेचे आहे. जर ते यापैकी एकही सामना जरी हरले तरी ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून