Rahul Narvekar : आमदार अपात्रतेबाबत आज सादर होणार का सुधारित वेळापत्रक?

  137

दोनदा ताकीद दिल्यानंतर आजचा दिवस महत्वाचा


मुंबई : राज्यात राजकारणात ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray Vs Shinde) असा संघर्ष गेल्या दीड वर्षापासून सुरु आहे. त्यात पवार काका पुतण्याच्या संघर्षाचीही भर पडली आहे. ठाकरे गटाने शिवसेना आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाने राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाविरोधात आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, या याचिकांवर सुनावणी करण्यास विलंब होत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


आमदार आपात्रतेचा निर्णय घेण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने पूर्णतः राहुल नार्वेकरांवर सोपवलं असल्याने त्यांनी या सुनावणीसाठी वेळापत्रक तयार केलं होतं. मात्र, वेळापत्रक वेळखाऊ असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने दोनदा ते फेटाळलं होतं. यानंतर नार्वेकरांना ३० ऑक्टोबर ही सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार आज नार्वेकर बदल केलेलं वेळापत्रक सादर करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मागच्या सुनावणीवेळी अध्यक्षांनी वेळापत्रक दिले नाही तर, आम्हीच वेळापत्रक देऊ आणि त्या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल, असे सरन्यायाधीशांनी बजावले होते. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना ७ याचिकांमध्ये एकत्र करून कामाला सुरुवात केली होती. याबाबतचा तपशील आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला दिला जाण्याची शक्यता आहे.


आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास ही चर्चा चालल्याची माहिती मिळाली आहे. ‘‘मेहता यांच्याकडून जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो घेतला आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका मांडू’’, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.