World Cup: वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा भारत ठरला दुसरा देश

Share

मुंबई: वर्ल्डकप २०२३मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले. या वर्ल्डकपमध्ये भारताचा हा सहावा विजय आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि सर्वच सामने जिंकले आहेत.

भारताच्या वर्ल्डकपमधील सहाव्या सामन्यात गजविजेता इंग्लंडही भारताचा विजयीरथ रोखू शकला नाही. या विजयासह टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर वर्ल्डकपच्या इतिहासात एक नवा रेकॉर्डही आपल्या नावे केला आङे.

टीम इंडिया या सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा संघ ठरला आहे. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत वर्ल्डकपमधील ५९ सामने जिंकले आहेत. या बाबतीत आता भारतापेक्षा पुढे एकच संघ आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने कोणी जिंकले

आतापर्यंत झालेल्या सर्व वर्ल्डकपमच्या सामन्यांना मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण ७३ वर्ल्डकप सामने आपल्या नावे केले. हे जगातील सर्वाधिक सामने आहेत. या यादीत आता दुसरे नाव भारताचे आहे. त्यांनी ५९ सामने जिंकले आहेत. भारतानंतर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे त्यांनी आतापर्यंत ५८ सामने जिंकले आहत.

याशिवाय भारताविरुद्ध वर्ल्डकप सामना हरल्यानंतर इंग्लंडच्या संघानेही नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आङे. इंग्लंडच्या क्रिकेट टीमने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सलग चौथा सामना गमावला आहे. याआधी वर्ल्डकपमधील सामन्यात असे कधीच घडले नव्हते.

गतविजेत्या इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टातच आले आहे. त्यांचे तीन सामने उऱले आहेत. जे अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

31 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago