World Cup: वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा भारत ठरला दुसरा देश

मुंबई: वर्ल्डकप २०२३मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले. या वर्ल्डकपमध्ये भारताचा हा सहावा विजय आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि सर्वच सामने जिंकले आहेत.

भारताच्या वर्ल्डकपमधील सहाव्या सामन्यात गजविजेता इंग्लंडही भारताचा विजयीरथ रोखू शकला नाही. या विजयासह टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर वर्ल्डकपच्या इतिहासात एक नवा रेकॉर्डही आपल्या नावे केला आङे.

टीम इंडिया या सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा संघ ठरला आहे. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत वर्ल्डकपमधील ५९ सामने जिंकले आहेत. या बाबतीत आता भारतापेक्षा पुढे एकच संघ आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने कोणी जिंकले


आतापर्यंत झालेल्या सर्व वर्ल्डकपमच्या सामन्यांना मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण ७३ वर्ल्डकप सामने आपल्या नावे केले. हे जगातील सर्वाधिक सामने आहेत. या यादीत आता दुसरे नाव भारताचे आहे. त्यांनी ५९ सामने जिंकले आहेत. भारतानंतर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे त्यांनी आतापर्यंत ५८ सामने जिंकले आहत.

याशिवाय भारताविरुद्ध वर्ल्डकप सामना हरल्यानंतर इंग्लंडच्या संघानेही नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आङे. इंग्लंडच्या क्रिकेट टीमने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सलग चौथा सामना गमावला आहे. याआधी वर्ल्डकपमधील सामन्यात असे कधीच घडले नव्हते.

गतविजेत्या इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टातच आले आहे. त्यांचे तीन सामने उऱले आहेत. जे अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत.
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या