India Vs England World cup 2023 : विश्वचषकात पहिल्यांदाच विराट कोहली ९ चेंडूंमध्ये भोपळा घेऊन परतला!

श्रेयस अय्यर, शुभमन गिलही मैदानाबाहेर... इंग्लंडची दमदार खेळी


लखनऊ : आपल्या दमदार खेळीने जगभरात चाहते निर्माण केलेला भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीयांना प्रचंड निराश केले आहे. विश्वचषकातील (World cup 2023) आज भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) सामना लखनऊमध्ये सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या निर्णयावर खूश झाला. भारतालाही प्रथम फलंदाजीच करायची होती, असं त्याने म्हटलं. मात्र, इंग्लंडचा निर्णय त्यांना फायदेशीरच ठरल्याचे सध्याचे चित्र आहे. दमदार खेळी करत त्यांनी भारताच्या तीन अव्वल फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवले आहे.


भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आणि इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुभमन गिलचा (Shubhman Gill) त्रिफळा उडवला. गिलला ९ धावांवर तंबूत पाठवण्यात आले. विराट कोहली मैदानावर येताच एकच जल्लोष झाला, परंतु त्याला ८ चेंडूंत एकही धाव इंग्लंडच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराटवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला. विराट भोपळ्यावर माघारी परतला.


विराट कोहली आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, श्रेयस अय्यर एका शॉर्ट बॉलवर ४ धावांवर बाद झाला. त्यामुळे १९ षटकांतच भारताच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवण्यात इंग्लंडला यश आले आहे.


इंग्लंडने या स्पर्धेतील शेवटच्या पाच सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव करत एकदाच इंग्लंडला यश आले. मात्र, इंग्लंडचा संघ न्यूझीलंडकडून ९ विकेट्सने, अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी, दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी आणि श्रीलंकेकडून ८ विकेट्सने पराभूत झाला. याउलट भारत हा आतापर्यंत झालेल्या सामन्यांतील अपराजित संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण आपली जादू दाखवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला