IND vs ENG : २० वर्षांनी भारताने इंग्लंडला हरवले, मारला विजयी षटकार, शमी-बुमराहसमोर इंग्रज सेना ढेपाळली

लखनऊ: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंड संघाला कमी धावसंख्या असतानाही १०० धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या स्लो पिचवर २२९ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांवर कोसळला आणि भारताने १०० धावांनी विजय मिळवला.


भारताच्या विजयाचे हिरो ठरले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. या दोघांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात इंग्लंडची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. शमीने चार विकेट मिळवल्या. तर बुमराहने तीन इंग्लंडच्या फलंदाजांना आपली शिकार बनवली.


भारताने टॉस हरल्याने पहिल्यांदा फलंदाजी मिळाली होती. या सामन्यात भारताने पहिले तीन फलंदाज स्वस्तात परतले. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत भारताला २२९ ही धावसंख्या गाठून दिली. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावा केल्या. के एल राहुलने ३९ धावा केल्या.


यानंतर २३० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात डळमळीत झाली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण डाव १२९ धावांवर कोसळला. संघासाठी सर्वाधिक धावा २७ लियाम लिव्हिंगस्टोनने केल्या.



भारत सेमीफायनलमध्ये


या सामन्यातील विजयासह भारताने ६ सामने जिंकत १२ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे तसेच सेमीफायनलही गाठली आहे. दुसरीकडे इंग्लंडला ६ पैकी ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने ते या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून