IND vs ENG : २० वर्षांनी भारताने इंग्लंडला हरवले, मारला विजयी षटकार, शमी-बुमराहसमोर इंग्रज सेना ढेपाळली

लखनऊ: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंड संघाला कमी धावसंख्या असतानाही १०० धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या स्लो पिचवर २२९ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांवर कोसळला आणि भारताने १०० धावांनी विजय मिळवला.


भारताच्या विजयाचे हिरो ठरले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. या दोघांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात इंग्लंडची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. शमीने चार विकेट मिळवल्या. तर बुमराहने तीन इंग्लंडच्या फलंदाजांना आपली शिकार बनवली.


भारताने टॉस हरल्याने पहिल्यांदा फलंदाजी मिळाली होती. या सामन्यात भारताने पहिले तीन फलंदाज स्वस्तात परतले. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत भारताला २२९ ही धावसंख्या गाठून दिली. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावा केल्या. के एल राहुलने ३९ धावा केल्या.


यानंतर २३० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात डळमळीत झाली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण डाव १२९ धावांवर कोसळला. संघासाठी सर्वाधिक धावा २७ लियाम लिव्हिंगस्टोनने केल्या.



भारत सेमीफायनलमध्ये


या सामन्यातील विजयासह भारताने ६ सामने जिंकत १२ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे तसेच सेमीफायनलही गाठली आहे. दुसरीकडे इंग्लंडला ६ पैकी ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने ते या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या