The Lady Killer Trailer: अर्जुन आणि भूमीचा 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

  164

मुंबई: बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन कपूर(arjun kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर(bhumi pednekar) गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या आगामी सिनेमा 'द लेडी किलर'मुळे चर्चेत होते. आज रविवारी या सिनेमाच्या मेकर्सनी चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून स्पष्ट होते की हा सिनेमा चाहत्यांना मिस्ट्री आणि थ्रिलचा डोस देणार आहे.



रिलीज झाला अर्जुन कपूरचा 'द लेडी किलर'चा ट्रेलर


द लेडी किलरचा हा ट्रेलर २ मिनिटे आणि २२ सेकंदाचा आहे. याची सुरूवात अर्जुन कपूरसोबत होते. सिनेमात अर्जुन नव्या शहरात राहण्यास जातो. येथे त्याची भेट भूमी पेडणेकरशी होते. ट्रेलरमध्ये अर्जुनचा ढांसू लूक पाहायला मिळत आहे. भूमीही अर्जुनला कडवी टक्कर देताना दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर अपलोड होताच चाहत्यांना आवडू लागला आहे.


 


या दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार सिनेमा


द लेडी किलरच्या माध्यमातून अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. तर ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. अनेक युजर्सना त्यांची ही केमिस्ट्री आवडली आहे. हा सिनेमा येत्या ३ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. थिएटर्सशिवाय अर्जुनचा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


अर्जुन आपल्या प्रोफेशनल लाईफऐवजी लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. तो सध्या आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या अभिनेत्री मलायका अरोरा हिला डेट करत आहे. काही दिवसांआधी अर्जुनने तिला खास अंदाजामध्ये बर्थडे विश केले होते.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.