World cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचे विधान, विश्वास होत नाही एका रात्रीत...

  75

मुंबई: इंग्लंड क्रिकेट टीमला आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेविरुद्ध गुरूवारी २६ ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यात सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन टीम १५६ धावांवर ढेर झाली. आव्हानाचा पाठलाग करताना २५.४ षटकांत केवळ दोन गडी गमावत श्रीलंकेने हे आव्हान पूर्ण केले.


या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.


सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला, हे मर्यादेपेक्षा कठीण आहे. एक कर्णधार म्हणून मी याचे दु:ख अधिक समजू शकतो. मी एक कर्णधार म्हणून प्रचंड निराश आहे. तसेच टीमबाबतही नाराज आहे. आम्ही आमच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपेक्षा फार खालच्या स्तराचा खेळ दाखवला. आमच्यासोबत टीममध्ये सध्या अनेक अनुभवी खेळाडू आहेत. तुम्ही एकदम एका रात्रीत वाईट टीम ठरत नाहीत याचाच आम्हाला जास्त त्रास होत आहे.


आम्ही आमच्या कामगिरीपासून खूप कोस लांब आहोत. यामागे काही खास कारण नाही. यावर आम्ही बोट उठवूच शकत नाही. संघ निवड ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यासोबत तुम्ही सातत्याने असता. निवड ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाहीच. आम्ही चांगला खेळ दाखवू शकलो नाही.





Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची