Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


नवी मुंबई : ज्येष्ठ आणि जगभरात ख्याती असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरुळ येथे अखेरचा श्वास घेतला.


त्यांनी आपल्या खास कीर्तन शैलीने अध्यात्म आणि भागवत सांप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवले. वारकरी सांप्रदायाशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. विठ्ठलाच्या (Vitthal) भक्तीत रममाण होणा-या आणि ज्ञानेश्वरीमध्ये (Dnyaneshwari) आपलं संपूर्ण आयुष्य घालवलेल्या बाबा महाराजांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर मोठा आघात झाला आहे.

महाराष्ट्राच्या गावागावांत बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन आवडीने ऐकलं जायचं. ज्या गावात बाबा महाराजांचं कीर्तन झालं नाही असं गाव सापडणं फार कठीण आहे. उतारवयात त्यांना फार वेळ कीर्तनासाठी उभं राहणं शक्य होत नव्हतं मात्र त्यांच्या नातवाने त्यांची कीर्तनाची परंपरा सुरु ठेवली आहे. परंतु त्यांच्या प्रवचनाचे लाखो चाहते महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे बाबा महाराजांची कीर्तने लोक खास कॅसेट्स घेऊन नित्यनेमाने ऐकतात.


यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ८ महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. नेरुळ येथील जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात बाबा महाराजांचं पार्थिव आज दुपारी तीन वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे मंदिर बाबा महाराजांनीच उभं केलं होतं. उद्या संध्याकाळी पाच वाजता याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




इंग्रजी माध्यमातून शिक्षण ते कीर्तनापर्यंतचा प्रवास


बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध