Encounter: पाकिस्तानी सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले मोठे यश

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या माछिल सेक्टरमध्ये गुरूवारी सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांकडून केला जाणारा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. एलओसीवर सुरक्षा रक्षकांनी मोठ्या ऑपरेशनमध्ये लष्कर ए तोयबाच्या ५ दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.


जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी माछिल सेक्टरमध्ये पोलिसांच्या एका विशेष इनपुटच्या आधारावर लष्करासोबत मिळून संयुक्त अभियान सुरू केला होते. सूत्रांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवाद्यांचा एक गट या भागात धुसखोरी करण्याचा प्रयत्न कऱणार असल्याची सूचना दिली होती.



सहा तासांच्या दीर्घकाळ ऑपरेशनंतर आणखी ३ दहशतवादी ठार


घुसखोरी कऱणाऱ्या दहशतवाद्यांच्यागटाला सीमेजवळ सतर्क सैनिकांकडून ट्रॅक करण्यात आले आणि आव्हान दिले. या दहशतवाद्यांना जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात सुरूवातीला दोन दहशतवादी मारले गेले तर इतरांनी या भागाचा फायदा उचलला. अखेर ६ तासांच्या दीर्घ ऑपरेशननंतर आणखी ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.



मारण्यात आलेल्या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटवतेय पोलीस


जम्मू-काश्मी पोलिसांनी सोशल मीडिया एक्सवर माहिती देताना म्हटले की लष्कर ए तोयबाचे तीन आणखी दहशतवादी मारले गेले.यांची संख्या एकूण ५ झाली आहे. या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

PoK India : पीओके भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानसोबत फक्त याच मुद्यावर चर्चा - राजनाथ सिंह

कारगिल : भारत पाकिस्तानसोबत केवळ पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) या मुद्द्यावरच चर्चा करेल असे

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य

Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?

नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War)

Delhi Protest : तब्बल ३६ दिवसांनंतर जंतर-मंतर आंदोलन संपलं; रातोरात धुऊन स्वच्छ करण्यात आलं आंदोलनस्थळ

नवी दिल्ली : तब्बल ३६ दिवस घोषणाबाजी (Sloganeering), आंदोलन (Protest) आणि विद्यार्थ्यांच्या (Students) गर्दीने गजबजलेलं जंतर-मंतर (Jantar

Paper Leaks : पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी विधेयक

नवी दिल्ली : देशभरात पेपर लीकच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान