Mumbai pollution : मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी दीपक केसरकरांच्या नव्या उपाययोजना

  71

समुद्रकिनारी स्वच्छतेसाठीही विशेष लक्ष देणार


मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे तसेच खराब वातावरणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा (Air Quality) प्रचंड खालावला (Mumbai pollution) आहे. सकाळच्या वेळी लांबच्याच नव्हे तर जवळच्याही इमारती अंधूक दिसतात इतकं प्रदूषण मुंबईत वाढलं आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालवला आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या कंपन्या तसेच उद्योगांनीही यात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.


मुंबईत प्रचंड लोकसंख्या वाढल्याने वाहनांची गर्दीही तितकीच वाढली आहे आणि हे प्रदूषणाचं एक मोठं कारण आहे. मुंबईत इमारती बांधण्याचे प्रकल्पदेखील वेगाने सुरु आहेत, त्यांच्या बांधकामामुळेही हवेत धूलिकण पसरुन प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यांवर नियंत्रण आणणे तसेच रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.


मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही कंपन्या प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती केसरकरांनी दिली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


समुद्रकिनारी देखील चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. मिठी नदी समुद्राला मिळते, त्यामुळे माहिमच्या समुद्राच्या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. या भागात मिठी नदीतून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची साफसफाई करावी लागेल, असं ते म्हणाले. पालकमंत्री केसरकर स्वतः सोमवारी माहिम ते दादर चौपाटी असा फेरफटका मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक