Mumbai pollution : मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी दीपक केसरकरांच्या नव्या उपाययोजना

समुद्रकिनारी स्वच्छतेसाठीही विशेष लक्ष देणार


मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या अनेक प्रकल्पांमुळे तसेच खराब वातावरणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा (Air Quality) प्रचंड खालावला (Mumbai pollution) आहे. सकाळच्या वेळी लांबच्याच नव्हे तर जवळच्याही इमारती अंधूक दिसतात इतकं प्रदूषण मुंबईत वाढलं आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा दिल्लीपेक्षाही खालवला आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या कंपन्या तसेच उद्योगांनीही यात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.


मुंबईत प्रचंड लोकसंख्या वाढल्याने वाहनांची गर्दीही तितकीच वाढली आहे आणि हे प्रदूषणाचं एक मोठं कारण आहे. मुंबईत इमारती बांधण्याचे प्रकल्पदेखील वेगाने सुरु आहेत, त्यांच्या बांधकामामुळेही हवेत धूलिकण पसरुन प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यांवर नियंत्रण आणणे तसेच रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं केसरकरांनी स्पष्ट केलं.


मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही कंपन्या प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती केसरकरांनी दिली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


समुद्रकिनारी देखील चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली. मिठी नदी समुद्राला मिळते, त्यामुळे माहिमच्या समुद्राच्या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. या भागात मिठी नदीतून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची साफसफाई करावी लागेल, असं ते म्हणाले. पालकमंत्री केसरकर स्वतः सोमवारी माहिम ते दादर चौपाटी असा फेरफटका मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार