Weather Update: कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस! चक्रवाती वादळाने बदलले हवामान

नवी दिल्ली : हवामान विभागाने चक्रवाती वादळामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. येथे पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेगवान वारे आणि वीज कडाडण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. सोबतच चेन्नई आणि तामिळनाडूच्या किनारी भागातही हवामान बदलण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे देशाच्या इतर भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा परिणाम दिसू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली आणि लखनऊमध्ये पुढील पाच दिवस धुके वाढण्याची शक्यता आहे.


पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. चक्रवाती वादळाबाबत बोलायचे झाल्यास आयएमडीने सांगितले की चक्रवाती वादळ २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चटगाव यांच्यात बांगलादेशचा किनारा पार करण्याची शक्यता आहे.


आजच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार आज ओडिशाच्या उत्तरी किनारी, गंगीय पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत