पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र-गोवा दौऱ्यावर! साईदर्शनानंतर करणार 'या' प्रकल्पांचे लोकार्पण

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी राज्यात सुमारे ७,५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.


पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा करणार आहेत. यानंतर अहमदनगरमध्ये सव्वा दोन वाजता निलवंडे धरणाचे जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे साई मंदिरात पूजा आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन देखील करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ वाजून ३० मिनिटांनी शिर्डीच्या काकडी ग्राउंडवर कोट्यवधींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील करतील. यानंतर पीएम मोदी शिर्डीहून गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील फतोर्डा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी संध्याकाळी ६ वाजता ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात जन्मलेल्या भारतीय प्रोफेशनल विंड सर्फर कात्या इडा कोएल्हो गुरुवारी येथे ३७व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द करतील. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाच तास चालणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्यात सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार सादरीकरण करणार आहेत.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात