तेल अवीव: इस्त्रायलविरुद्ध(israel) युद्ध लढत असलेल्या दहशतवादी संघटनना हमासने(hamas) सोमवारी सांगितले की त्यांनी आणखी दोन जणांना सोडले आहे. दोन्ही महिला आहे. ७ ऑक्टोबरला हल्ला केल्यानंतर त्यांना इतर लोकांसोबत बंदी करण्यात आले होते.
न्यूज एजन्सी एएफपीनुसार हमासने सांगितले की त्यांनी कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीमुळे मानवीय कारणामुळे दोघांची सुटका केली आहे. याआधी हमासने अमेरिकन आई-मुलीची सुटका केली होती. आता हमासकडून सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांबाबत इस्त्रायलकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
इस्त्रायलने म्हटले होते की गाझामध्ये २२२ जणांना बंदी करण्यात आले आहे यात दोन महिलांना शुक्रवारी २० ऑक्टोबरला सोडण्यात आले. अलजजिराच्या रिपोर्टनुसार हमासचे एक प्रवक्ता ओसामा हमदान यांच्या माहितीनुसार इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी या बंदीवानांना सोडले जाण्याबाबतची गोष्ट स्वीकारली नाही. आता स्वीकारली आहे. हमासच्या प्रवक्त्यांनी सांगितले, त्यांना सोडण्याबद्दल आम्हाला काही मिळाले नाही आम्ही मानवीय पैलूवर त्यांना सोडले आहे.
हमासच्या प्रवक्त्याने इस्त्रायलवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. ओसामा हमदान म्हणाले, आम्ही त्यांना सोडण्यासाठी कमीत कमी काही वेळेसाठी गाझावर बॉम्बहल्ला बंद करणे, रेड क्रॉसजवळ पाठवणे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांकडे पाठवण्यास सांगितले होते. इस्त्रायलने त्याचे पालन केले नाही. यावरून समजते की इस्त्रायलवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार हमासच्या मिलिट्री विंग कासिम बिग्रेडने आपल्या टेलीग्राम चॅनेलच्या माध्यमातून दोन आणखी बंदीवानांची सुटका केल्ययाची घोषणा केली. यांचे नाव नुरिट यित्जाक आणि योचेवेद लिफशिट्ज आहे. याआधी अमेरिकन आई जुडिथ रानन आणि त्यांची मुलगी नताली यांची सुटका करण्यात आली होती.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…