Wagh Bakri Group : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन

  129

भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला... उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली


अहमदाबाद : गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड वाघ बकरी (Gujarat Tea Processors & Packers Ltd. Wagh Bakri tea) या प्रतिष्ठित चहा ब्रँडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी अहमदाबाद (Ahmedabad) येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. पराग यांच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


पराग यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराजवळील इस्कॉन रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, तेव्हाच त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. ते चालत असताना अचानक काही भटक्या कुत्र्यांनी (Dog Attack) त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ज्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.


पराग यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटर (Ventilator) वर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डोक्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली आणि काल रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू आधी सात दिवस ते व्हेंटीलेटरवर होते.



ब्रँडला एका उंचीवर नेण्यात पराग यांचे मोलाचे योगदान


अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधूल एमबीएची पदवी घेतलेले पराग देसाई हे वाघ बकरी चहा व्यवसायातील चौथी पिढी होते. चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत त्यांनी ब्रँडला एका उंचीवर नेलं होतं. सध्या ते कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने वाघ बकरी कंपनीवर शोककळा पसरली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे