India-canada tension: कॅनडाच्या लोकांसाठी लवकरच सुरू होऊ शकते व्हिसा सर्व्हिस मात्र...

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर भारताला कॅनडामध्ये आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती दिसली तर ते कॅनडाच्या लोकांसाठी लवकरच व्हिसा सर्व्हिस सुरू करू शकतात. ते म्हणाले भारताकडून काही आठवड्यांआधी ही व्हिसा सर्व्हिस अस्थायी काळासाठी थांबवण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा ही आहे. कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही आहे जे व्हिएन्ना संधीचे उल्लंघन आहे.


भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. याचे कारण खालिस्तानी दहशतवादी याचा हरदीप सिंह निज्जर याची हत्या आहे. निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला आहे. सोबतच कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना ओटावा सोडून जाण्यास सांितले.


भारताने याआधीच निज्जर हत्या प्रकरणात आपला हात नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता. सोबतच कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सर्व्हिस बंद केली होती.



परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?


जयशंकर म्हणाले जर आम्ही कॅनडामध्ये आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत प्रगती पाहिली तर आम्ही व्हिसा सर्व्हिस सुरू करण्याबाबत विचार करू. मी आशा करतो की असे लवकरच झाले पाहिजे. काही आठवड्यांआधी कॅनडामध्ये भारताने व्हिसा जारी करण्याची प्रोसेस बंद केली होती.


परराष्ट्र मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की सुरक्षा स्थिती अधिक चांगली होईल. ते म्हणाले चांगली सुरक्षा दिल्यास राजनैतिक अधिकऱ्यांना आत्मविश्वासाने काम करणे शक्य होईल. राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा निश्चित करणे वियना संधीचा सगळ्यात मोठा पैलू आहे. आता कॅनडामध्ये अनेक आव्हाने आहेत यामुळे आमचे लोक सुरक्षित नाहीत. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती होताच व्हिसा सर्व्हिस सुरू होईल.


भारतातून नुकतेच ४२ कॅनडाचे राजनैतिक अधिकारी गेले आहेत. त्यांना दिल्ली सोडण्याचा आदेश मिळाला होता.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च