Ban on Pakistani artists : पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली!

मुंबई : २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि संगीतकारांसह पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्यास बंदी घालण्यात (Ban on Pakistani artists) आली होती. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवण्यात आली आहे.


काही दिवसांपुर्वी एका सिनेकर्मीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात माहिरा खान, फवाद खान यांसारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे की, ''देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.'' न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


मुंबई उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, या याचिकेत योग्यता नाही आणि भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे हा निर्णय एक दिलासा आहे. यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.


या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील