Ban on Pakistani artists : पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली!

  171

मुंबई : २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि संगीतकारांसह पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्यास बंदी घालण्यात (Ban on Pakistani artists) आली होती. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवण्यात आली आहे.


काही दिवसांपुर्वी एका सिनेकर्मीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात माहिरा खान, फवाद खान यांसारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे की, ''देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.'' न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


मुंबई उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, या याचिकेत योग्यता नाही आणि भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे हा निर्णय एक दिलासा आहे. यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.


या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.