Pollution: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई(mumbai) प्रदूषणाच्या(pollution) बाबतीत राजधानी दिल्लीला(delhi) मागे टाकत आहे. मुंबईने सलग तिसऱ्यांदा प्रदूषित शहर बनण्याच्या यादीत दिल्लीला मागे टाकले. मंगळवारपर्यंत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक(Air Quality Index) ११३ इतका होता. गुरूवारी सकाळी हा आकडा वाढून १६१ इतका झाला आहे. दिल्लीपेक्षाही हा आकडा भयानक आहे. गुरूवारी सकाळपर्यंत दिल्लीचा AQI ११७ इतका होता.


वाहन प्रदूषणामुळे दिल्ली नेहमीच सगळ्यात जास्त प्रदूषित शहर राहिले आहे. येथे सर्वाधिक प्रदूषण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात होते आणि दिवाळीत याचा स्तर धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. दिल्ली सरकार गेल्या काही वर्षांपासून या समस्येसाठी हरयाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दोषी ठरवत आहे.


दरम्यान, मुंबईत धुक्याची चादरही दाट झालेली दिसत आहेय यामुळे AQI मध्ये मुंबईने दिल्लीला मागे टाकले. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की मुंबईत सुरू असलेल्या निर्माण योजना, जसे मेट्रोची कामे हे प्रदूषण अधिक वाढवण्यास मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात फॉगिंग मशीन लावली जात आहेत.


याशिवाय धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला आहे. पीटीआयच्या बातमीनुसार मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील वाशिंद आणि टिटवाळादरम्यान सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत तसेच रायगड जिल्ह्याच्या कर्जत ते बदलापूर दरम्यान सकाळी साडेपाच ते ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती.

Comments
Add Comment

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता