मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना पाहण्यासाठी अहमदाबाद (Ahmedabad) येथे गेली असताना तिचा महागडा फोन चोरीला गेल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. उर्वशीनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social Media account) यासंबंधी माहिती दिली होती. तिने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. त्यानंतर आता चोराने थेट उर्वशीला एक मेल केला आहे. त्यात त्याने एक मागणी केली आहे. ती मागणी उर्वशीने पूर्ण केली तर मोबाईल परत करेन असं चोराने या मेलमध्ये म्हटलं आहे.
उर्वशी ही बॉलिवूडच्या सुंदर आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिचा फोनही तितकाच महागडा होता. २४ कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोन (Iphone) ती वापरत होती. हा आयफोन चोरीला गेल्याने तिला धक्का बसला होता आणि तिने सोशल मीडियावर चोरीची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. कोणाला फोन सापडला तर ताबडतोब संपर्क साधा, असे आवाहनही तिने यामार्फत केले होते.
उर्वशीच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, सोबतच फोन चोरी करणार्याने एक मागणीही केली आहे. ग्रो ट्रेडर्स (Groww Traders) या नावाने उर्वशीला मेल आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट (Screenshot) तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ‘तुमचा फोन माझ्याजवळ आहे. तुम्हाला फोन परत हवा असेल तर माझी मदत करावी लागेल. माझ्या भावाला कॅन्सर (Cancer) आहे, त्याचा उपचार करा’ असा मेल चोराने केला आहे. चोराच्या या मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्वशीने थम्स-अपच्या इमोजीने रिप्लाय दिला आहे.
सोशल मीडियावर तिने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलीस चोराला पकडू शकतात, असे नेटकऱ्यांनी उर्वशीला सांगितले. मात्र, उर्वशीने चोराच्या मेलबाबत पोलिसांना सांगितले की नाही, याबाबत अद्याप कोणताही माहिती नाही.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…