Nitesh Rane : आदित्य ठाकरेंचं कॅव्हेट म्हणजे चोर की दाढी में तिनका

केवळ मतांच्या राजकारणासाठी इंडिया अलायन्सचं दहशतवाद्यांना समर्थन


भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी टीका केली. आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांना १९९२ दंगलीच्या काळात जेव्हा बॉम्बब्लास्ट झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं तेव्हा दहशतवादी देशाची कशी वाट लावू शकतात हे त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तरीही केवळ मतांच्या राजकारणासाठी ते आमच्या पंतप्रधानांवर टीका करत होते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


पुढे नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या (INDIA Alliance) कोणालाही आम्ही कुठेही हमासचा निषेध करताना ऐकलेलं नाही. दहशतवाद्यांविरोधात बोलताना आम्ही ऐकलं नाही. म्हणजे मतांच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. देशामध्ये जे जिहादी विचारांचे लोक आहेत, ते हमासचं समर्थन करतात आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांना पाठिंबा देतात. मी तर असं ऐकलं की तो ओवेसी कार्टा त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून त्या रॅलीत उद्या दिसले तर आश्चर्य वाटायला नको.


आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडुपमध्ये बसून आमच्या पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना सल्ले देत होता. वाजपेयी साहेबांचे दाखले देत होता. पण जो बाळासाहेबांचे विचार विसरला आहे, त्यांची हमासविरोधी, दहशतवादाविरोधी भूमिका विसरला आहे, त्याने आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं नितेश राणे यांनी राऊतांना बजावलं आहे.



हा नियतीचा खेळ आहे


ठाण्यामध्ये टेंभीनाक्यावर जो नवरात्रौत्सव साजरा होतो त्या ठिकाणी आज रश्मी ठाकरे दर्शनाला गेल्या होत्या. तर तिकडचा फॅन आणि कुलर कोणीतरी बंद केला म्हणून त्यांचा फार जळफळाट झाला, त्यांना चीड आली. तिथले अधिकारी त्यांना घाबरले. उद्धव ठाकरेंना मी आठवण करुन देईन की, २००४ मध्ये रंगशारदाला होणार्‍या शिवसेनेच्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे येणार होते, पण त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांना बसायला देऊ नये म्हणून खुर्ची काढून टाकण्याचे आदेश तुमच्याकडून देण्यात आले होते. असाच प्रकार तुम्ही राज ठाकरे साहेबांसोबत देखील केला. त्यांची खुर्चीच स्टेजवरुन काढून टाकण्यात आली होती. आज तुमच्या बायकोवरही तशीच वेळ आली. त्यामुळे हा नियतीचा खेळ आहे. नियती बरोबर आपल्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तर देते, असं नितेश राणे म्हणाले.



चोर की दाढी में तिनका


दिशा सालियन आणि सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी कॅव्हेट दाखल करत आमचीही बाजू ऐकून घ्यावी, असं म्हटलं आहे. यावर नितेश राणे म्हणाले, याला चोर की दाढी में तिनका असं म्हणतात. जर ती आत्महत्या होती तर त्या संदर्भात आदित्य ठाकरेंना इतकी चिंता का वाटते? ते तर तिथे उपस्थित नव्हते. मग तुम्हाला कन्व्हेंट दाखल करावंसं का वाटलं? त्यामुळे आमच्यासारख्या फॅन्सचं म्हणणं आहे की त्यांचा मर्डर झाला होता आणि त्यातील नावं आता हळूहळू आपोआप बाहेर येतील आणि दोघांनाही न्याय मिळेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस