Narayan Rane : शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना खोट्या बातम्या देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गौप्यस्फोट


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर शरद पवार (Sharad pawar) यांनी टीका केली. यासंबंधी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.


नारायण राणे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांनी इस्राइल व हमासबद्दल केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन. दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरोधात नसून तो माणुसकीविरोधात असतो अशी भूमिका आदरणीय पंतप्रधानांनी घेतली होती. जी-२० आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या व्यासपीठांवर देखील त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवाद्यांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मग दहशतवादाविरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे, असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? पॅलेस्टाईन आणि दहशतवाद एकच आहे असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.


शरद पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात बरीच मंत्रीपदं भूषवली. मुख्यत्वे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की, १९९३ दंगलीच्या काळात जेव्हा साखळी बॉम्बब्लास्ट झाले त्यात ५४ मृत्यूमुखी पडले तर १४०० जण जखमी झाले. त्या वेळी ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी १३ बॉम्बब्लास्ट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता का? असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.


तुष्टीकरणाच्या धोरणामुळे आजवर देशावर अनेक संकटे आली. आज तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का? दहशतवादाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? असे सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी शरद पवारांना खडसावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,