Narayan Rane : शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना खोट्या बातम्या देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गौप्यस्फोट


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर शरद पवार (Sharad pawar) यांनी टीका केली. यासंबंधी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.


नारायण राणे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांनी इस्राइल व हमासबद्दल केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन. दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरोधात नसून तो माणुसकीविरोधात असतो अशी भूमिका आदरणीय पंतप्रधानांनी घेतली होती. जी-२० आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या व्यासपीठांवर देखील त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवाद्यांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मग दहशतवादाविरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे, असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? पॅलेस्टाईन आणि दहशतवाद एकच आहे असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.


शरद पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात बरीच मंत्रीपदं भूषवली. मुख्यत्वे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की, १९९३ दंगलीच्या काळात जेव्हा साखळी बॉम्बब्लास्ट झाले त्यात ५४ मृत्यूमुखी पडले तर १४०० जण जखमी झाले. त्या वेळी ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी १३ बॉम्बब्लास्ट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता का? असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.


तुष्टीकरणाच्या धोरणामुळे आजवर देशावर अनेक संकटे आली. आज तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का? दहशतवादाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? असे सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी शरद पवारांना खडसावले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील