Mumbai Weather : मुंबईकरांनो आता मास्क लावूनच फिरा! कोरोना नव्हे तर 'हे' कारण...

  293

मुंबईकरांना काळजी घ्यायची गरज 


मुंबई : कोरोनाच्या काळात (Covid pandemic) तोंडावर मास्क (Mask) लावून फिरताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. याची सवय नसल्यामुळे ब-याचदा लोकांना श्वास गुदमरल्यासारखं व्हायचं. नंतर सवय झाली आणि कोरोनाचा प्रभावही काही प्रमाणात कमी झाला. लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं. पण आता पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळेस कोरोना नव्हे तर मुंबईचं प्रदूषित (Pollution) झालेलं (Mumbai bad Weather) वातावरण मास्क लावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.


दिल्लीतील (Delhi) हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (Air Quality Index) हा दरवर्षी सगळ्यात जास्त खालावलेला असतो. तिथली प्रचंड लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचे अनेक प्रकल्प यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र, असं असतानाच मुंबई आणि पुण्याने गुणवत्तेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकलं आहे. दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० आहे तर मुंबईच्या बाबतीत तो १४६ इतका वाढला आहे. पुण्याने तर १७८ इतक्या प्रदूषित हवेचा निर्देशांक गाठला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना श्वसनाचे विकार जडू नयेत यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे.


मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब आहे आणि हवेतील धुलिकणांमुळे सकाळच्या वेळेस दृश्यमानताही प्रचंड कमी होते. सकाळच्या वेळेस धुकं पसरलंय की काय अस वाटत असलं तरी ती प्रदूषणामुळे खराब झालेली हवा आहे. या हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणे सक्तीचे नसले तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.