Mumbai Weather : मुंबईकरांनो आता मास्क लावूनच फिरा! कोरोना नव्हे तर 'हे' कारण...

  300

मुंबईकरांना काळजी घ्यायची गरज 


मुंबई : कोरोनाच्या काळात (Covid pandemic) तोंडावर मास्क (Mask) लावून फिरताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. याची सवय नसल्यामुळे ब-याचदा लोकांना श्वास गुदमरल्यासारखं व्हायचं. नंतर सवय झाली आणि कोरोनाचा प्रभावही काही प्रमाणात कमी झाला. लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं. पण आता पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळेस कोरोना नव्हे तर मुंबईचं प्रदूषित (Pollution) झालेलं (Mumbai bad Weather) वातावरण मास्क लावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.


दिल्लीतील (Delhi) हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (Air Quality Index) हा दरवर्षी सगळ्यात जास्त खालावलेला असतो. तिथली प्रचंड लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचे अनेक प्रकल्प यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र, असं असतानाच मुंबई आणि पुण्याने गुणवत्तेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकलं आहे. दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० आहे तर मुंबईच्या बाबतीत तो १४६ इतका वाढला आहे. पुण्याने तर १७८ इतक्या प्रदूषित हवेचा निर्देशांक गाठला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना श्वसनाचे विकार जडू नयेत यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे.


मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब आहे आणि हवेतील धुलिकणांमुळे सकाळच्या वेळेस दृश्यमानताही प्रचंड कमी होते. सकाळच्या वेळेस धुकं पसरलंय की काय अस वाटत असलं तरी ती प्रदूषणामुळे खराब झालेली हवा आहे. या हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणे सक्तीचे नसले तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी