Mumbai Weather : मुंबईकरांनो आता मास्क लावूनच फिरा! कोरोना नव्हे तर 'हे' कारण...

मुंबईकरांना काळजी घ्यायची गरज 


मुंबई : कोरोनाच्या काळात (Covid pandemic) तोंडावर मास्क (Mask) लावून फिरताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. याची सवय नसल्यामुळे ब-याचदा लोकांना श्वास गुदमरल्यासारखं व्हायचं. नंतर सवय झाली आणि कोरोनाचा प्रभावही काही प्रमाणात कमी झाला. लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं. पण आता पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळेस कोरोना नव्हे तर मुंबईचं प्रदूषित (Pollution) झालेलं (Mumbai bad Weather) वातावरण मास्क लावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.


दिल्लीतील (Delhi) हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (Air Quality Index) हा दरवर्षी सगळ्यात जास्त खालावलेला असतो. तिथली प्रचंड लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचे अनेक प्रकल्प यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र, असं असतानाच मुंबई आणि पुण्याने गुणवत्तेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकलं आहे. दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० आहे तर मुंबईच्या बाबतीत तो १४६ इतका वाढला आहे. पुण्याने तर १७८ इतक्या प्रदूषित हवेचा निर्देशांक गाठला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना श्वसनाचे विकार जडू नयेत यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे.


मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब आहे आणि हवेतील धुलिकणांमुळे सकाळच्या वेळेस दृश्यमानताही प्रचंड कमी होते. सकाळच्या वेळेस धुकं पसरलंय की काय अस वाटत असलं तरी ती प्रदूषणामुळे खराब झालेली हवा आहे. या हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणे सक्तीचे नसले तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता

'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने

वातानुकूलित लोकलमध्ये बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलेस अटक

मुंबई  : रेल्वे तिकीट तपासनिसाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाकडून बनावट तिकीट कल्याण-दादर वातानुकूलित

बीएमसी गुंतवणूक घोटाळ्याच्या वादाला नवीन वळण

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास

मुंबईत मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी

फुटपाथ, गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई  : मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून लटकलेल्या जाहिरात

नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी मेट्रो प्रकल्प यशस्वी

व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माहिती मुंबई  : मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि