IND vs BAN: सरावादरम्यान पावसाची हजेरी, भारत-बांगलादेश सामन्यादिवशी कसे असेल हवामान?

  36

पुणे:विश्वचषक २०२३मधील १७व्या सामन्यात आज भारताचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानावर ९ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. या वर्षी जानेवारीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात पुणे येथे टी-२० सामना खेळवण्यात आला होता. यात श्रीलंकेने भारताला १६ धावांनी हरवले होते.


बांगलादेश संघ भारतात भारताविुद्ध २५ वर्षानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. गेल्यावेळेस १९९८मध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघाच्या मागच्या ५ सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशने तीन तर भारताने दोन सामने जिंकले आहेत.


पुण्यात बुधवारी हलकासा पाऊस झाला. एमसीए स्टेडियममध्ये दोन्ही संघाच्या सरावादरम्यान अचानक पाण्याचे थेंब टपकू लागले. यामुळे ग्राऊंड स्टाफला मुख्य पिचवर कव्हर घालावे लागले. स्थानिक हवामान विभागाने बुधवारी हलका पाऊस तसेच काळे ढग राहतील अशी शक्यता व्यक्त केली होती.


दरम्यान, अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार गुरूवारी पावसाची शक्यता नाही आहे. दिवसभार तापमान ३२ डिग्री सेल्सियस इतके राहू शकते. तर पावसाची शक्यता १ ते ४ टक्के आहे. जर पाऊस झालला तर सामन्यावर याचा परिणाम होऊ शकतो.


पुण्यात दुपारच्या वेळेस आर्द्रता ५० टक्के राहू शकते. तसेच हवेचा वेग २२ किमी प्रति तास राहील. येथे संध्याकळच्या वेळेस दव असू शकतो. त्यामुळे टॉस नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो.



फलंदाजीत चांगली संधी


पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आतापर्यंत ७ वनडे सामने झालेत त्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने ४ वेळा तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ वेळा विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला