IND vs BAN : कोहलीने मारला षटकार, भारताने लगावला विजयी चौकार

  56

पुणे: कोहलीला आपले शतक पूर्ण करण्यासाठी ३ धावा हव्या होत्या तर भारताला विजयासाठी २ धावांची गरज होती. कोहली आपले शतक साजरे करणार का की त्याआधीच भारताचा विजय होणार याकडे समस्त चाहत्यांचे लक्ष लागले होते. मात्र कोहलीने तो षटकार ठोकला आणि सगळं कन्फ्युजनच दूर केले.


कोहलीने ४२व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर नसूमला षटकार ठोकला आणि आपले शतक पूर्ण केलेच मात्र भारताला विजयही मिळवून दिला. भारताने बांगलादेशविरुद्ध ७ विकेटनी विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेले २५७ धावांचे आव्हान भारताने ४१.३ षटकांत पूर्ण केले.



विराटचे शानदार शतक


भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक साजरे केले. त्याने ९७ बॉलमध्ये १०३ धावांची खेळी साकारली. भारताची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्माचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. त्याने ४८ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने मात्र आपले अर्धशतक साजरे केले. त्याने ५३ धावांची खेळी केली. विराट कोहलीने या सामन्यात दमदार शतक तडकावले. त्याने ९७ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. त्याने केवळ १९ धावा केल्या. लोकेश राहुलने ३४ धावांची खेळी केली.



बांगलादेशच्या २५६ धावा


तत्पूर्वी, बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत २५६ धावा केल्या होत्या. बांगलादेशने सुरूवात चांगली केली. दोन्ही सलामीवीरांनी प्रत्येकी अर्धशतक ठोकले. सलामीवीर तांझीद हसनने ५१ धावा केल्या तर लिटन दासने ६६ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. त्यानंतर खालच्या फळीतील महमदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत बांगलादेशला अडीचशे पार धावसंख्या नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.


भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या तर शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.



भारताचा सलग चौथा विजय


भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला तर चौथ्या सामन्यात बांगलादेशला हरवले आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार