UT69 : तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा आहे - राज कुंद्रा

मुंबई: शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचा बायोपिक यूटी ६९चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात खुद्द राज कुंद्राने आपली भूमिका बजावली आहे. एक अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. त्यांचा यूटी ६९ हा सिनेमा त्यांनी जेलध्ये घालवलेल्या २ महिन्यांच्या अनुभवावरील आहे.


ट्रेलरमध्ये राज कुंद्रा यांनी जेलमध्ये घालवलेल्या कटू आठवणींची झलक दाखवली आहे. हा सिनेमा शाहनवाज अली यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या ३ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपला सिनेमा यूटी ६९च्या एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान राज कुंद्रा यांनी सिनेमाच्या विषयाबाबत खुलेपणाने बातचीत केली.


त्यांनी सांगितले की जेलमधील त्यांचे कसे अनुभव आहेत. त्यांनी सांगितले, त्यांच्यासाठी तो जेलमधील काळ किती कठीण होता. अशातच त्यांची पत्नी आणि कुटुंबाने यातून बाहेर काढण्यास मदत केली. ते ६३ दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते.दरम्यान,मी प्रार्थना करतो की हे दिवस कोणाच्याच नशीबी येऊ नयेत.


 


तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा


तुरुंगात आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत राज कुंद्रा म्हणाले, जेव्हा तुम्ही ब्रिटीश नागरिकाला एका अशा घटनेत तुरुंगात घेऊन जाता तेव्हा सगळेच हास्यास्पद होते. ज्या पद्धतीने तुम्हाला जेवण दिले जाते. पाणी असलेली डाळ, राहण्याची जागा. माझ्या गुडघ्याला प्रॉब्लेम होता त्यामुळे मला इंडियन टॉयलेटमध्ये बसता येत नव्हते. तेव्हा मला इंग्लिश टॉयलेट दिला जातो. ते इतके भयानक होते. तुम्ही सिनेमात पाहू शकता काय काय घडले होते ते. अमेरिकन जेल आणि सिनेमात जे तुरुंग दाखवतात तसेच तुरुंग नसतात. जेलचा अंधारमय भाग आम्ही पाहिला आहे. इमानदारीने सांगू तर तुरुंग ही पृथ्वीवरील सगळ्यात भयानक जागा आहे.


Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.