Rohit Sharma : रोहित शर्माचा काय हा निष्काळजीपणा! स्वतःच्या आलिशान गाडीने गेला पण...

  233

भारताच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे...


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपचे (Cricket World cup 2023) वारे वाहत आहेत. मात्र, हे वारे उलट्या दिशेने वाहतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, तुलनेने दुबळे संघ तगड्या संघांविरोधात बाजी मारत आहेत. त्यामुळे भारतालाही आता प्रचंड सावध राहून खेळण्याची गरज आहे. असं असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र निष्काळजीपणा केला आहे.


त्याचं झालं असं की, अहमदाबादमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता. तिथे दोन दिवस मजेत घालवल्यानंतर तो पुन्हा संघात सामील होण्यासाठी सज्ज झाला. यासाठी मंगळवारी तो मुंबईहून पुण्याला जायला निघाला. मात्र, जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार लेम्बोर्गिनी उरस तब्बल २०० किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. यासाठी त्याला तीन चालानही बजावण्यात आले आहेत.


वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेग मर्यादा ताशी १०० किलोमीटर एवढी आहे. मात्र, आपल्या कर्णधाराने गाडी दुप्पट वेगाने चालवली. प्रवासादरम्यान रोहित शर्माने वाहतुकीचे नियम मोडले. ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने कधीकधी २०० किमी/तास हून अधिक, तर कधी-कधी २१५ किमी/तास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवली. या मुळे, त्याच्या कारच्या नंबर प्लेटवर तीन ऑनलाइन ट्रॅफिक चालान जारी करण्यात आले आहेत.

वाहतूक विभागाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय कर्णधाराने एवढ्या वेगाने कार चालवणे अयोग्य आहे. त्याने संघाच्या बसनेच प्रवास करायला हवा आणि त्याच्या सोबत पोलिसांची गाडीही असायला हवी". अख्खा भारत ज्यांच्याकडे आपले आदर्श म्हणून पाहतो, ज्या क्रिकेट वर्ल्डकपकडे अख्ख्या देशाचे डोळे लागून राहिले आहेत, त्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे, अशा प्रतिक्रिया यामुळे उमटत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर, संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृतीने वेधले लक्ष

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, २५ ते ३० गोळ्या झाडल्या

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना घडली. युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला.