World cup 2023: विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय, श्रीलंकेवर ५ विकेटनी मात

लखनऊ: विश्वचषकातील पहिलावहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका(srilnaka) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ५ विकेटनी हरवले. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी तसेच ३५.२ षटकांत पूर्ण केले.


ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील हा पहिलाच विजय आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला अद्याप खाते खोलता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाला याआधी भारत आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघावर चहूबाजूंनी टीका होत होती. अखेर त्यांना विजयाचा सूर गवसला.



भक्कम सुरूवात मात्र...


या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ २०९ धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. श्रीलंकेची सलामीची जोडी पथुम निसांकाने ६१ धावा केल्या तर कुसल परेराने ७८ धावांची खेळी केली. या दोघांनी संघाला भक्कम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली.


मात्र बाकी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. चरिथ असलंकाने २५ धावांची खेळी करत सामन्यात थोडीफार हातभार लावला. मात्र इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव २०९ धावांवर आटोपला.



शंभरीच्या आत गमावले तीन विकेट


दुसरीकडे २१० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला २४ सलग दोन धक्के बसले. ऑस्ट्रेलियाने शतक गाठण्याआधीच आपले ३ गडी गमावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा विजय साकारणार का यात थोडी शंकाच वाटत होती. मत्र त्यानंतर मार्नस लाबुशग्ने आणि जोश इग्निस यांनी डाव सावरत चांगली भागीदारी रचली. यामुळे ऑस्ट्रेलियाला हा विजय साकारता आला.

Comments
Add Comment

पाकचा कर्णधार बदलाचा सिलसिला सुरूच! मोहम्मद रिझवानकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले

लाहोर: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने

सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी