S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना वाय दर्जाऐवजी झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.


आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. याआधी परराष्ट्र मंत्र्यांना दिल्ली पोलीस कमांडोकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांच्या मते केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. ६८ वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय दर्जाच्या सुरक्षा घेऱ्यात दिल्ली पोलिसांची एक सशस्त्र टीम करत होती.


सूत्रांच्या माहितीनुसार आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीआरपीएफकडून झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. यात देशभरताली शिफ्टमध्ये चोवीस तास त्यांच्यासोबत १४-१५ सशस्त्र कमांडो असतील. सीआरीएफचे व्हीआयपी सुरक्षा कव्हरमध्ये सध्या १७६ दिग्गज आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३