S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना वाय दर्जाऐवजी झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.


आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. याआधी परराष्ट्र मंत्र्यांना दिल्ली पोलीस कमांडोकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांच्या मते केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. ६८ वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय दर्जाच्या सुरक्षा घेऱ्यात दिल्ली पोलिसांची एक सशस्त्र टीम करत होती.


सूत्रांच्या माहितीनुसार आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीआरपीएफकडून झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. यात देशभरताली शिफ्टमध्ये चोवीस तास त्यांच्यासोबत १४-१५ सशस्त्र कमांडो असतील. सीआरीएफचे व्हीआयपी सुरक्षा कव्हरमध्ये सध्या १७६ दिग्गज आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत