S Jaishankar: एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, दिली झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(s jaishankar) यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना वाय दर्जाऐवजी झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.


आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली आहे. याआधी परराष्ट्र मंत्र्यांना दिल्ली पोलीस कमांडोकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, सूत्रांच्या मते केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. ६८ वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय दर्जाच्या सुरक्षा घेऱ्यात दिल्ली पोलिसांची एक सशस्त्र टीम करत होती.


सूत्रांच्या माहितीनुसार आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सीआरपीएफकडून झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. यात देशभरताली शिफ्टमध्ये चोवीस तास त्यांच्यासोबत १४-१५ सशस्त्र कमांडो असतील. सीआरीएफचे व्हीआयपी सुरक्षा कव्हरमध्ये सध्या १७६ दिग्गज आहेत. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी