IND vs AFG: टीम इंडियाच्या विजयावर रोहित शर्माने दिली ही प्रतिक्रिया

नवी दिल्ली: भारताने विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) ९व्या सामन्यात अफगाणिस्तानला ८ विकेटनी हरवले. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने रेकॉर्डतोड शतक ठोकले. रोहितने सामन्यानंतर भारताच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने दिल्लीची पिच आणि शतकाबाबतही बातचीत केली. रोहितने सांगितले की कधी कधी बॉलच्या हिशेबाने शॉट खेळतो आणि यासाठी आधीपासूनच तयार असतो. शतक ठोकल्यानंतर खुश आहे.


दिल्लीत विजयानंतर रोहित म्हणाला, पिच बॅटिंगसाठी सोपी होती. मला माहिती होते की विकेट सोपी होत जाईल. मी या गोष्टीने खुश आहे की प्लानच्या हिशेबाने सगळं काही झालं आणि शतक ठोकले. मी रेकॉर्डबाबत विचार करत नाही. आपला फोकस गमवायचा नसतो. आता रस्ता अजून खूप दूर आहे. मी कधी कधी शॉर्टबाबत आधी विचार करतो आणि बॉलच्या हिशेबाने खेळतो.


अफगाणिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले. रोहितने ८४ बॉलमध्ये १३१ धावा तडकावल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. इशान किशनचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याने ४७ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळी दरम्यान ५ चौकार आणि २ षटकार ठोकले.


विराट कोहली ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ६ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरनेही नाबाद २५ धावांची खेळी केली. त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख