IND vs AFG: टीम इंडियाच्या विजयावर रोहित शर्माने दिली ही प्रतिक्रिया

नवी दिल्ली: भारताने विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) ९व्या सामन्यात अफगाणिस्तानला ८ विकेटनी हरवले. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने रेकॉर्डतोड शतक ठोकले. रोहितने सामन्यानंतर भारताच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने दिल्लीची पिच आणि शतकाबाबतही बातचीत केली. रोहितने सांगितले की कधी कधी बॉलच्या हिशेबाने शॉट खेळतो आणि यासाठी आधीपासूनच तयार असतो. शतक ठोकल्यानंतर खुश आहे.


दिल्लीत विजयानंतर रोहित म्हणाला, पिच बॅटिंगसाठी सोपी होती. मला माहिती होते की विकेट सोपी होत जाईल. मी या गोष्टीने खुश आहे की प्लानच्या हिशेबाने सगळं काही झालं आणि शतक ठोकले. मी रेकॉर्डबाबत विचार करत नाही. आपला फोकस गमवायचा नसतो. आता रस्ता अजून खूप दूर आहे. मी कधी कधी शॉर्टबाबत आधी विचार करतो आणि बॉलच्या हिशेबाने खेळतो.


अफगाणिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले. रोहितने ८४ बॉलमध्ये १३१ धावा तडकावल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. इशान किशनचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याने ४७ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळी दरम्यान ५ चौकार आणि २ षटकार ठोकले.


विराट कोहली ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ६ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरनेही नाबाद २५ धावांची खेळी केली. त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून