Garlic : कांदा, टोमॅटोनंतर आता लसणाचे राजकारण!

इराणी आणि चायनीज लसूण बाजारात आल्याने शेतकरी धास्तावले


मुंबई : काही दिवसांपूर्वी टोमॅटो (Tomato) आणि कांद्याच्या (Onion) दरात मोठी वाढ झाली होती. पण कांदा, टोमॅटोची आयात करुन त्याचे दर घसरवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता इराणी आणि चायनीज लसूण (Garlic) बाजारात आल्याने भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारच्या या आयात धोरणाचा शेतकऱ्यांकडून (Farmer) पुन्हा एकदा निषेध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


सध्या बाजारापेठांमध्ये भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण इराण आणि चीनमधून लसूण बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा भारतीय लसणाला भाव मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.


जळगाव बाजार समितीमध्ये सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील बाजार समितीकडून या इराणी लसणाची आवक होत आहे. त्यामुळे हा लसूण खायला तितका चवदार नसतो. पण तरीही हा लसूण भारतीय लसणापेक्षा हा मोठा आणि सुंदर असतो. त्यामुळे त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. शिवाय याचे दरही भारतीय लसणाच्या दराइतकेच आहेत. त्यामुळे ग्राहक त्याला पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.


आधीच शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता हा विदेशी लसूण बाजारात आल्याने शेतकऱ्याचे अधिक नुकसान होणार असल्याचे शेतकरी संघटना नेते एस बी नाना पाटील यांनी सांगितले. सरकारकडून हे शेतकरी विरोधी धोरण असल्याचा आरोप करत कोणत्याही शेतमालाचा भाव वाढला की सरकार तो पाडण्यासाठी विदेशी माल आयात करते. तसेच निर्यात शुल्क देखील वाढवते, असा आरोपही नाना पाटील यांनी केला आहे. तसेच आता आपल्या शत्रू राष्ट्राकडून लसणाची आयात करुन लसणाचे दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Dhule Crime News : “अपमान सहन झाला नाही”; संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक

Accident : मिसिंग लिंकवर तीन तासांत दोन अपघात, मुंबई - पुणे वाहतूक विस्कळीत

पुणे : मुंबई ते पुणे प्रवास हा प्रवास वेगाने करण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे प्रवास