नांदगाव : जनावरांचा चारा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आग लागून चाळीस हजाराचा कडबा जाळून खाक झाला.
नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण बनत चालली असून पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात चाऱ्याच्या किंमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून काही दिवसांनी चारा मिळणेही मुश्किल होणार आहे. तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच नांदगाव तालुक्यातील पळाशी येथून चारा खरेदी करून मनमाड जवळील पाणेवाडीकडे जाणाऱ्या जनावरांचा चाऱ्यानी भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण आग लागली. नांदगाव मनमाड रोडवर असलेल्या चालत्या ट्रॅक्टर मध्ये दोन एकरचा जनावरांसाठी चारा भरलेला दोन ट्रॉलीला अचानक आग लागल्याने चारा आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली.
पाणेवाडी येथील शेतकरी भागा सांगळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसून, येथील नागरिकांच्या मदतीने व येथील काही अंतरावरील निलेश सर्व्हिस स्टेशनवर ट्रॅक्टर थांबवून पाणी मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्या नंतर नांदगाव नगर पालिकेचा मिनीबंब दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील प्रयत्न केले परंतु चारा जळून खाक झाला. अखेर कॉलेज जवळील पटांगणात चाऱ्याची टारली नेऊन जेसीबीच्या सहाय्याने खाली केली तरी देखील आग सुरूच होती यात सुमारे ४० हजाराचा कडबा चारा जळून खाक झाला, या दरम्यान नांदगांव पोलिसांनी जळालेल्या चाऱ्याची पाहणी केली.
“नांदगांव शहरा नजीक चालू ट्रॅक्टरच्या कडब्याला कुणीतरी आग लावल्याने चारा जळून खाक झाला यात माझे ४० हजार रुपयाचे आर्थीक नुकसान झाले आहे असे पाणेवाडी येथील शेतकरी भागा सांगळे यांनी सांगितले.”
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…