Shivsena: शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना(shivsena) हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात(supreme court) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष तसेच त्याचे चिन्ह आपले असल्याचा दावा दोन्ही एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गटाने केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह दिले होते.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयला उद्धव ठाकरे गटाने विरोध केला होता आणि त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय सांगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे का हे चित्रही स्पष्ट होईल.


याआधी १८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली होती. त्यावेळेस तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे आज ही महत्त्वाची सुनावणी होत आहे.


निवडणूक आयोगाने याआधी शिंदे गटाला शिवसेना हे नाव तसेच पक्षचिन्ह दिले होते. यावेळेस निवडणूक आयोगाने विधीमंडळातील आमदारांची संख्या तसेच २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीती विजयी शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. यानुसार निवडणूक आयोगाने हा निकाल दिला होता.

या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णयाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या