Shivsena: शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना(shivsena) हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात(supreme court) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष तसेच त्याचे चिन्ह आपले असल्याचा दावा दोन्ही एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गटाने केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह दिले होते.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयला उद्धव ठाकरे गटाने विरोध केला होता आणि त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय सांगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे का हे चित्रही स्पष्ट होईल.


याआधी १८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली होती. त्यावेळेस तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे आज ही महत्त्वाची सुनावणी होत आहे.


निवडणूक आयोगाने याआधी शिंदे गटाला शिवसेना हे नाव तसेच पक्षचिन्ह दिले होते. यावेळेस निवडणूक आयोगाने विधीमंडळातील आमदारांची संख्या तसेच २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीती विजयी शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. यानुसार निवडणूक आयोगाने हा निकाल दिला होता.

या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णयाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास