ENG vs BAN: वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने विजयी खाते उघडले, बांगलादेशला १३७ धावांनी हरवले

धरमशाला: इंग्लंडने बांगलादेशला(ENG vs BAN) १३७ धावांनी हरवले. बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र शाकिब अल हसनचा संघ ४८.२ षटकांत २२७ धावांवर आटोपला. यासोबतच जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने विश्वचषकातील पहिला विजय मिळवत आपले खाते उघडले. याआधी इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ९ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता.


बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक धावा केल्या. या विकेटकीपर फलंदाजाने ६६ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने आपल्या डावात ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. दरम्यान, त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज सातत्याने बाद होत गेले. मुशफिकुर रहीमने ६४ बॉलमध्ये ५१ धावा केल्या. तर तौहीद हृदयने ६१ बॉलमध्ये ३९ धावांची खेळी केली. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन, मेहंदी हसन, नजमुल हौसेन शंटो आणि तंजीद हसन या फलंदाजांनी निराश केले.


इंग्लंडसाठी रीस टॉप्लेने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. रीस टॉप्लेने १० ओव्हरमध्ये ४३ धावा देत ४ विकेट आपल्या नावे केल्या. क्रिस वोक्सला २ विकेट मिळवता आल्या. याशिवाय मार्क वूड, आदिल रशीद, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एका खेळाडूला बाद केले.



इंग्लंडचा ३६४ धावांचा डोंगर


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने ५० ओव्हरमध्ये ९ बाद ३६४ धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी सलामीवीर डेविड मलानने १०७ बॉलमध्ये १४० धावांची खेळी केली. तर ज्यो रूटने ६८ बॉलमध्ये ८२ धावा केल्या.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख