NAMO Shetkari Yojana : महायुतीची यशस्वी घोडदौड; नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

लवकरच जमा होणार पहिला हप्ता


मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने (Mahayuti Government) घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Yojana) पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडताना ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.



काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेप्रमाणेच आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करते. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी केंद्र सरकारचे सहा व राज्य सरकारचे सहा असे मिळून बारा हजार रुपये जमा होणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे