NAMO Shetkari Yojana : महायुतीची यशस्वी घोडदौड; नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

लवकरच जमा होणार पहिला हप्ता


मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने (Mahayuti Government) घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Yojana) पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडताना ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहेत. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.



काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेप्रमाणेच आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करते. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाकाठी केंद्र सरकारचे सहा व राज्य सरकारचे सहा असे मिळून बारा हजार रुपये जमा होणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई