World Cup: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर, टीमसोबत दिल्लीला गेला नाही

  87

मुंबई: टीम इंडियाने विजयासह जोरदार सुरूवात केली आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले होते. सामन्यात सलामीवीर शुभमन गिल(shubman gill) खेळला नव्हता. त्याला ताप होता. आता तो दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर झाला आहे. बीसीसीआयने याची माहिती दिली. भारताचा दुसरा सामना ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटलीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.


भारतीय संघ चेन्नईवरून दिल्लीसाठी रवाना झाला आहे आणि गिल अद्यापही चेन्नईमध्येच आहे. मेडिकल टीम गिलच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गिलच्या जागी इशान किशनने सलामीवीराची भूमिका निभावली होती. मात्र त्याला खातेही खोलता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले होते.


शुभमन गिलच्या तब्येतीबाबत बीसीसीआयने सांगितले की शुभमन गिल टीमसोबत ९ ऑक्टोबरला दिल्लीा जाणार नाही. तो पहिल्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही. तो चेन्नईत राहील आणि मेडिकल टीम त्यांची देखभाल करेल. गिलने सलामीवीर म्हणून २०२३मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने द्विशतकही ठोकले आहे.


आशिया चषक स्पर्धेतही गिलने शतकी खेळी केली होती. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने कमाल कामगिरी केली होती. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशनला विश्वचषकातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली मात्र तो शून्य धावा करून बाद झाला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार