Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग, १० जणांचा मृत्यू, १३ जखमी

अरियलूर: तामिळनाडूच्या(tamilnadu)अरियलूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाका कंपनीत लागलेल्या भीषण आगीत(fire) तब्बल १० जणांचा मृत्यू झाला तर १३ इतर जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी आपल्या विधानात या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे.


ही घटना तामिळनाडूच्या विरालगुर गावातील एका खासगी फटाका कंपनीत झाली. फॅक्टरीमध्ये आग कशी लागली याचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ५ जखमी लोकांवर तंजावूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.



मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा


मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रूपये तर गंभीर जखमींना एक लाख रूपये आणि साधारण जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजारांची मदतीची घोषणा केली आहे.


प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तेथे देशी फटाके तसेच अत्यंत ज्वलनशील रसायने होती. ही रसायने सांभाळताना घर्षणामुळे स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. आगीत होरपळल्याने मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनतर तेथे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीत एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकी वाहनांसह अनेक वाहने जळून खाक झाली.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे