Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग, १० जणांचा मृत्यू, १३ जखमी

अरियलूर: तामिळनाडूच्या(tamilnadu)अरियलूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाका कंपनीत लागलेल्या भीषण आगीत(fire) तब्बल १० जणांचा मृत्यू झाला तर १३ इतर जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी आपल्या विधानात या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे.


ही घटना तामिळनाडूच्या विरालगुर गावातील एका खासगी फटाका कंपनीत झाली. फॅक्टरीमध्ये आग कशी लागली याचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ५ जखमी लोकांवर तंजावूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.



मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा


मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रूपये तर गंभीर जखमींना एक लाख रूपये आणि साधारण जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजारांची मदतीची घोषणा केली आहे.


प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तेथे देशी फटाके तसेच अत्यंत ज्वलनशील रसायने होती. ही रसायने सांभाळताना घर्षणामुळे स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. आगीत होरपळल्याने मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनतर तेथे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीत एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकी वाहनांसह अनेक वाहने जळून खाक झाली.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ