Israel-Palestine war: एअर इंडियाची इस्त्रायलची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियाई देश पुन्हा एकदा युद्धाच्या झळांमध्ये होरपळून निघत आहेत. शनिवारी सकाळी हमासकडून इस्त्राईलवर(israel) हल्ला केल्यानंतर जगात पुन्हा एकदा नव्या युद्धाची सुरूवात झाली आहे. याचा परिणाम चारही बाजूंना पाहायला मिळत आहे. समोरचे संकट पाहता विमान कंपनी एअर इंडियाने इस्त्राईलची राजधानी तेल अवीवला जाणारी आपली उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.



कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली ही माहिती


एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी रविवारी दुपारी माहिती दिली की विमान कंपनी तेल अवीवला जाणारी तसेच तेथून येणारी सर्व उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवक्त्यांनी सांगितले की कंपनीने आपल्या चालक दलाचे सदस्य आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडे १४ ऑक्टोबरपर्यंतचे कन्फर्म तिकीट आहे त्या सर्व प्रवाशांना कंपनी शक्यतोपरी मदत करणार आहे.



आठवड्यातून पाच वेळा असतात उड्डाणे


टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाकडून तेल अवीव आणि नवी दिल्ली यांच्यात आठवड्यातून पाच वेळा विमानांची ये-जा केली जाते. ही उड्डाणे सोमवार, मंगळवार, गुरूवार, शनिवार आणि रविवारी होतात. कंपनीने शनिवारी पहिल्यांदा उड्डाण रद्द केल्याचे सांगितले.



सकाळीच झाली होती हल्याला सुरूवात


हमासने इस्त्रायलवर शनिवारी सकाळीच हल्ला केला होता. यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले. इस्त्रायलवर अशा पद्धतीचा हल्ला गेल्या पाच दशकांत पहिल्यांदा पाहायला मिळाला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला