Accident: भोरच्या वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस, चालकाचा मृत्यू

  87

पुणे: पुण्यातील भोरच्या वरंधा घाटात शनिवारी एका मिनी बसला मोठा अपघात(accident) झाला. स्वारगेट येथून भोरमार्गाने महाड-चिपळूणकडे जाणारी एक मिनी बस वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघाताता चालकाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले.


शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या स्वारगेट येथून भोरमार्गे महाड-चिपळूणच्या दिशेने ही बस जात होती. त्यावेळेस वरंधा घाटात ही बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला असलेल्या ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.


या घाटात रस्त्यांना संरक्षण कडे नाहीत. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, ही बस धरणाच्या पाण्यापासून ५ फुटांवर अडकली. नाहीतर मोठा अनर्थच घडला असता.


या अपघातात अजिंक्य कोलते हा चालक जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर गाडीतील इतर सर्व प्रवासी सुखरूप आहे. काही जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक