Accident: भोरच्या वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस, चालकाचा मृत्यू

  80

पुणे: पुण्यातील भोरच्या वरंधा घाटात शनिवारी एका मिनी बसला मोठा अपघात(accident) झाला. स्वारगेट येथून भोरमार्गाने महाड-चिपळूणकडे जाणारी एक मिनी बस वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघाताता चालकाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले.


शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या स्वारगेट येथून भोरमार्गे महाड-चिपळूणच्या दिशेने ही बस जात होती. त्यावेळेस वरंधा घाटात ही बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला असलेल्या ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.


या घाटात रस्त्यांना संरक्षण कडे नाहीत. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, ही बस धरणाच्या पाण्यापासून ५ फुटांवर अडकली. नाहीतर मोठा अनर्थच घडला असता.


या अपघातात अजिंक्य कोलते हा चालक जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर गाडीतील इतर सर्व प्रवासी सुखरूप आहे. काही जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या