PM Congratulates Asian Players : भारताच्या शतकावर पंतप्रधान खूश; शुभेच्छा देत व्यक्त केली खेळाडूंना भेटण्याची इच्छा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०१ पदकांची कमाई


नवी दिल्ली : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian games 2023) भारताने आतापर्यंतची सर्वांत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांचे शतक (Century of medals) गाठले आहे. २६ सुवर्ण (Gold), ३५ रौप्य (Silver) आणि ४० ब्राँझ (Bronze) पदकांची कमाई करत भारत सर्वाधिक पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. आज महिलांच्या कबड्डी संघाने तैपेईचा पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० झाली. तर ओजस देवतळेने पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ही संख्या १०१ वर नेली.


भारताच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड खूश झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही भारतासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आम्ही १०० पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे अशा आमच्या अभूतपूर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.


पुढे त्यांनी लिहिले आहे की, आपल्या खेळाडूंच्या प्रत्येक विस्मयकारक कामगिरीने इतिहास घडवला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० तारखेला आमच्या आशियाई खेळाडूंशी भेटीचे आयोजन करणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. आता भारताने आणखी चमकदार कामगिरी करत आधिकाधिक पदके जिंकावीत अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी