PM Congratulates Asian Players : भारताच्या शतकावर पंतप्रधान खूश; शुभेच्छा देत व्यक्त केली खेळाडूंना भेटण्याची इच्छा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०१ पदकांची कमाई


नवी दिल्ली : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian games 2023) भारताने आतापर्यंतची सर्वांत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांचे शतक (Century of medals) गाठले आहे. २६ सुवर्ण (Gold), ३५ रौप्य (Silver) आणि ४० ब्राँझ (Bronze) पदकांची कमाई करत भारत सर्वाधिक पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. आज महिलांच्या कबड्डी संघाने तैपेईचा पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० झाली. तर ओजस देवतळेने पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ही संख्या १०१ वर नेली.


भारताच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड खूश झाले आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही भारतासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. आम्ही १०० पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे अशा आमच्या अभूतपूर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.


पुढे त्यांनी लिहिले आहे की, आपल्या खेळाडूंच्या प्रत्येक विस्मयकारक कामगिरीने इतिहास घडवला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० तारखेला आमच्या आशियाई खेळाडूंशी भेटीचे आयोजन करणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. आता भारताने आणखी चमकदार कामगिरी करत आधिकाधिक पदके जिंकावीत अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व