Nawab Malik : काकांची साथ सोडून दादांना पाठिंबा... राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 'ते' ४२ वे आमदार नवाब मलिक!

शरद पवारांना मोठा धक्का


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) २ जुलै या दिवशी मोठी फूट पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शरदकाका विरुद्ध अजितदादा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गट आपल्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दावे करत आहेत. यावर निवडणूक आयोगात पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक (Nawab Malik) अजितदादांना पाठिंबा देणार आहेत. अजित पवार गटाने आपल्या बाजूला ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार असणार आहेत.


काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची आजारी असल्याच्या कारणामुळे जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर दोनच दिवसांत दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नेत्यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळेस नबाव यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. काही दिवसांत आपला निर्णय कळवेन असं ते म्हणाले होते. त्यांच्या बोलण्यावरुन आणि इतर प्रतिक्रियांवरुन ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता जास्त होती. मात्र, सर्व अंदाज आणि तर्कवितर्क चुकीचे ठरवत नवाब मलिक यांनी अजितदादांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.


निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, अशी माहिती आहे.


राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत