Asian games 2023 : आशियाई स्पर्धांमध्ये भारताने इतिहासात पहिल्यांदाच गाठले पदकांचे शतक!

महिला कबडडी संघाने कमावले शंभरावे पदक आणि २५ वे सुवर्णपदक...


हांगझोऊ : चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये (Asian games 2023) भारताने आतापर्यंतची सर्वांत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. भारताच्या खेळाडूंनी पदकांचे शतक (Century of medals) गाठले आहे. २५ सुवर्ण (Gold), ३५ रौप्य (Silver) आणि ४० ब्राँझ (Bronze) पदकांची कमाई करत भारत सर्वाधिक पदकांच्या यादीत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. आज महिलांच्या कबड्डी संघाने तैपेईचा पराभव करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि भारताच्या एकूण पदकांची संख्या १०० झाली.


आशियाई स्पर्धेच्या चौदाव्या दिवशी महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड तिरंदाजीमध्ये अदिती गोपीचंद स्वामीला दिवसाचे पहिले पदक कांस्यपदक मिळाले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत इंडोनेशियाच्या रतिह फदलीचा १४६-१४० असा पराभव केला. याच स्पर्धेत ज्योतीने दक्षिण कोरियाच्या चावोन सोचा या खेळाडूचा १४९-१४५ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. थोड्याच वेळात, भारताने तिरंदाजीमध्येही सुवर्ण कामगिरी केली. ओजस देवतळेने पुरुषांच्या कंपाऊंड फायनलमध्ये आपला देशबांधव अभिषेक वर्माविरुद्ध १४९-१४७ असा विजय मिळवून सुवर्णपदक मिळवले.


अखेर महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा २६-२५ असा पराभव करत भारताच्या पदकांची संख्या १००वर नेली. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम १४-९ ने आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. आज दुपारी पुरूष कबड्डी टीम आणि पुरूष क्रिकेट टीम या दोन्हींचा अंतिम सामना आहे. या दोन्ही टीम्सकडून गोल्ड मेडलची आशा आहे.





भारताची २५ सुवर्णपदके...


भारताने आतापर्यंत नऊ खेळांमध्ये कमीत कमी एक सुवर्णपदक जिंकले आहे. यातील सर्वाधिक ७ सुवर्णपदके शूटिंगमध्ये मिळाली आहेत. तर, अ‍ॅथलेटिक्समध्ये ६ सुवर्णपदके मिळाली आहेत. आर्चेरीमध्ये ५ तर स्क्वाशमध्ये २ सुवर्णपदके मिळाली आहेत. यासोबतच टेनिस, हॉकी, कबड्डी, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक-एक सुवर्णपदक मिळाले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी