Goregaon Fire Accident : गोरेगांव आग दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर...

ट्विटद्वारे व्यक्त केला शोक


मुंबई : मुंबईतील गोरेगांवसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आज पहाटे ३च्या सुमारास आगीची भीषण (Goregaon fire) दुर्घटना घडली. यातील मृतांचा आकडा वाढून ८ वर पोहोचला आहे, तर ५१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र तसेच राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत गोरेगांव आग दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. त्यांनी लिहिलं आहे, मुंबईतील गोरेगावमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मला दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.





राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसंच आपल्या ट्विटमध्ये मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत ‘सायप्रस ट्रेड सेंटर’ उभारणार

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची घोषणा; बिझनेस फोरममध्ये भारत-सायप्रस दरम्यान सहा सामंजस्य

Mangrove Park in Gorai : गोराईत राज्याच्या पहिल्या 'कांदळवन पार्क'चे २८ मे रोजी उद्घाटन; निसर्गप्रेमींना मिळणार विरंगुळ्याचे नवे ठिकाण

मुंबई : अनेक दिवसांच्या आणि वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा

कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियामध्ये करार

राज्यातील युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना

मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारकडून बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित मुंबई : फडणवीस सरकारने मराठा समाजातील तरुण उद्योजकांना

Mumbai : वांद्रे पूर्वेतील झोपडपट्टीवर सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई; रेल्वेकडून विस्तीर्ण भूखंड मोकळा

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Mumbai Bandra East) रेल्वे स्थानकालगत असलेल्या 'गरीब नगर' (Garib Nagar) झोपडपट्टीवर प्रशासनाचा