NCP: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

  78

मुंबई: ऱाष्ट्रवादी पक्षाचे(NCP) चिन्ह तसेच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आज पार पडली. या बाबतची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यावेळी उपस्थित होते.


या सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाने खोटी कागदपत्रे दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावाही सिंघवी यांनी केलाय.


शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या. तर अजित पवार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आले होते.


निवडणूक आयोगात ही सुनावणी दोन तास चालली. पहिल्या भागाची सुनावणी एक तास होती. एनसीपीचे अधिकार आणि पक्ष चिन्ह याबाबत सोमवारी निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी केली जाणार आहे.



निवडणूक आयोगात गेले प्रकरण


अजित पवार यांनी ३० जूनला निवडणूक आयोगात पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. पुढील सुनावणीला म्हणजेच ९ ऑक्टोबरला अजित पवार गट आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडतील. नुकतेच काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की काही लोक स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता वेगळे झाले आहेत.

Comments
Add Comment

हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता

काळाच्या ओघातही टिकून संयुक्त कुटुंबाचे महत्त्व

संघाचे साहित्य प्रत्येक घरांत पोहोचवा : सरसंघचालक मोहन भागवतांची पंच परिवर्तनावर चर्चा कानपूर: कुंभमेळ्यात आपण

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी