मुंबई: ऱाष्ट्रवादी पक्षाचे(NCP) चिन्ह तसेच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आज पार पडली. या बाबतची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यावेळी उपस्थित होते.
या सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाने खोटी कागदपत्रे दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावाही सिंघवी यांनी केलाय.
शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या. तर अजित पवार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आले होते.
निवडणूक आयोगात ही सुनावणी दोन तास चालली. पहिल्या भागाची सुनावणी एक तास होती. एनसीपीचे अधिकार आणि पक्ष चिन्ह याबाबत सोमवारी निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी केली जाणार आहे.
अजित पवार यांनी ३० जूनला निवडणूक आयोगात पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. पुढील सुनावणीला म्हणजेच ९ ऑक्टोबरला अजित पवार गट आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडतील. नुकतेच काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की काही लोक स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता वेगळे झाले आहेत.
आरोपीला तात्काळ अटक पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाही.…
नागपूर : केरळ (Keral) राज्यातून आलेल्या कॅन्सर (Cancer) पीडित पत्नीच्या उपचारासाठी एक कुटुंब नागपूर शहरात…
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…