NCP: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

मुंबई: ऱाष्ट्रवादी पक्षाचे(NCP) चिन्ह तसेच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आज पार पडली. या बाबतची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यावेळी उपस्थित होते.


या सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाने खोटी कागदपत्रे दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावाही सिंघवी यांनी केलाय.


शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या. तर अजित पवार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आले होते.


निवडणूक आयोगात ही सुनावणी दोन तास चालली. पहिल्या भागाची सुनावणी एक तास होती. एनसीपीचे अधिकार आणि पक्ष चिन्ह याबाबत सोमवारी निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी केली जाणार आहे.



निवडणूक आयोगात गेले प्रकरण


अजित पवार यांनी ३० जूनला निवडणूक आयोगात पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. पुढील सुनावणीला म्हणजेच ९ ऑक्टोबरला अजित पवार गट आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडतील. नुकतेच काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते की काही लोक स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता वेगळे झाले आहेत.

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने