World Cup 2023: टीम इंडिया थेट विश्वचषकात खेळणार, नाही मिळाली सरावाची संधी

तिरूअनंतपुरम: भारत(india) आणि नेदरलँड्स(netherlands) यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. खरंतर, याआधीही भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात पावसाने खोडा घातल्याने रद्द करावा लागला होता. यामुळे विश्वचषकाआधी भारताला रोहित शर्माच्या नेतृत्वात एकही सराव सामना खेळावयास मिळाला नाही. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे हा सामना खेळवला गेला नाही.



भारतीय संघाला वर्ल्डकपआधी नाही मिळाली सरावाची संधी


याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला. आता भारतीय संघ थेट विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला खेळवला जाईल. दोन्ही संघ चेन्नईत आमनेसामने असतील. दरम्यान, विश्वचषकाचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे.



विश्वचषकात या संघांविरुद्ध खेळणार भारत


ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक अभियानाची सुरूवात केल्यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघादरम्यान दुपारी दीड वाजल्यापासून सामन्याला सुरूवात होईल. याशिवाय भारतीय संघ बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. तर या स्पर्धेचा शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या