Goa Bus accident : नियंत्रण सुटलं आणि चालक जागीच ठार... गोव्यात बसचा भीषण अपघात!

पणजीहून हैदराबादला निघाली होती बस


पणजी : गोव्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खाजगी बसचा भीषण अपघात (Goa Bus accident) झाला आहे. यात चालक जागीच ठार झाला असून इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पणजीहून (Panaji) हैदराबादच्या (Hyderabad) दिशेने निघाली होती. दरम्यान धारबांदोडा येथे या बसला अपघात झाला. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हैदराबादला निघालेली ही बस रस्त्याच्या एका वळणावर आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेत काढले. यावेळेला या बसमध्ये २३ प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन चालक आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत, पैकी ९ जणांची अवस्था गंभीर आहे.


पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये वामशी मुशरी (वय २३), श्‍वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) आणि शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव