Goa Bus accident : नियंत्रण सुटलं आणि चालक जागीच ठार... गोव्यात बसचा भीषण अपघात!

पणजीहून हैदराबादला निघाली होती बस


पणजी : गोव्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खाजगी बसचा भीषण अपघात (Goa Bus accident) झाला आहे. यात चालक जागीच ठार झाला असून इतर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पणजीहून (Panaji) हैदराबादच्या (Hyderabad) दिशेने निघाली होती. दरम्यान धारबांदोडा येथे या बसला अपघात झाला. या अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


हैदराबादला निघालेली ही बस रस्त्याच्या एका वळणावर आली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडली आणि अपघात झाला. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेत काढले. यावेळेला या बसमध्ये २३ प्रवासी आणि तीन चालक प्रवास करत होते. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन चालक आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत, पैकी ९ जणांची अवस्था गंभीर आहे.


पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये वामशी मुशरी (वय २३), श्‍वेता गदाम (वय २२), लिप्पस्वामी पिल्लई (वय २६), अर्चना व्ही (वय २५), आशिश सिरना (वय २१), साईच्छा लाडमतिनी (वय २५), शिवलिंग स्वामी, नितीन सोमण (वय २१), सौम्या कोटार (वय २४) आणि शिवराम रेड्डी (वय ४०) यांचा समावेश आहे. इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :