Navratri 2023 : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची आतुरता... का साजरी करतात नवरात्र?

जाणून घ्या नवरात्रीमागील आख्यायिका...


गणेशोत्सव (Ganeshotsav) संपला की महाराष्ट्रात चाहूल लागते ती नवरात्रीची (Navratri 2023). गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल याचप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर नवरात्र सण साजरा केला जातो. गरबा (Garba), दांडिया नाईट (Dandiya nights) यांमध्ये तर तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ठिकठिकाणी स्त्रिया आणि पुरुषही या गरब्यामध्ये आवडीने सहभाग घेतात. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजाअर्चा करण्यात येते. काही लोक तर नऊ दिवस उपवास करतात आणि या काळात अनवाणीच फिरतात. यंदा १५ ऑक्टोबरला घटस्थापनेचा मुहू्र्त आहे. मात्र, नवरात्र नेमकी का साजरी करण्यात येते? यामागची आख्यायिका काय आहे? जाणून घेऊयात आजच्या लेखात...



नवरात्रीमागे काय आख्यायिका आहे?


देवीची आरती म्हणताना आपण त्यात महिषासुरमर्दिनी (Mahishasura mardini) असं म्हणतो. पण त्यामागची नेमकी आख्यायिका आपल्यापैकी काही जणांनाच माहित आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस होता. अनेक वर्षे तपश्चर्या करुन त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. माझा कोणत्याही देवता, राक्षस किंवा मनुष्याच्या हातून वध होणार नाही, तो स्त्रीच्या हातून व्हावा, असा त्याने वर मागितला. ब्रह्मदेवाने त्याला वर देऊन टाकला. मात्र, त्यामुळे महिषासुराची ताकद वाढली आणि त्याने देवांचा पराभव करायला सुरुवात केली. सृष्टीच्या निर्मात्या विष्णूला आणि शंकरालाही त्याच्यासमोर हार मानावी लागली.


महिषासुराला हरवण्यासाठी सर्व देव एकत्र आले. त्यांना आदिशक्तीची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी केलेल्या प्रार्थनेतून एक दिव्य प्रकाश निघाला व दुर्गादेवीने सुंदर अप्सरेचे रुप धारण केले. तिला पाहून महिषासुर तिच्यावर भाळला आणि त्याने लग्न करायचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. अप्सरेने मात्र एक अट घातली. तुला माझ्याबरोबर युद्धात जिंकावे लागेल, अशी ती अट होती. महिषासुराने ही अट मान्य केली आणि सलग नऊ दिवस त्यांच्यात युद्ध सुरु राहिले. अखेर दहाव्या दिवशी अप्सरेने महिषासुरावर विजय मिळवला आणि तिला महिषासुरमर्दिनी असं नाव मिळालं. तेव्हापासून नऊ दिवसांकरता नवरात्र सण साजरा करण्यात येऊ लागला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC : मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आयुक्तांनी केली पाहणी, असे दिले निर्देश..

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील

Redevelopment of Pagdi Buildings : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न; जुने भाडेकरुन आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित

- सुधार समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पागडी तत्वावरील अर्थात ना उपकर

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा धारावी विकास प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव लांबणीवर

भाडेपट्ट्यांवर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीने ठेवला राखून पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबई

BMC News : सेव्हन हिल्स रुग्णालयाचा तिढा सुटला, सुधार समितीने दिली मंजुरी

आता ७६ खाटा आणि नंतर मिळणार ३०० खाटा महापालिकेला सेव्हन हिल्स हेल्थकेअरसोबत कॅप्री ग्लोबलसोबत करार करण्यास

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य