INDIA Alliance : जमावबंदी असताना 'मी पण गांधी' रॅली काढणार्‍या इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात...

  110

मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांनी आज मुंबईत फॅशन स्ट्रीटपासून ते मंत्रालयापर्यंत 'मी पण गांधी' पदयात्रेला (Mi pan Gandhi) सुरुवात केली. मात्र, या दरम्यान त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी ही अडवणूक केली मात्र इंडिया आघाडीचे नेते याला न जुमानता आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमुळे मंत्रालय परिसरात अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक गाड्या अडून राहिल्या आहेत व ट्राफिक जाम झाले आहे. मेट्रो सिनेमा - फॅशन स्ट्रीट - हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. मात्र जमावबंदीच्या कारणास्तव रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं.


पोलिसांच्या या म्हणण्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या रॅली पुढे नेणारच अशी आक्रमक भूमिका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.