INDIA Alliance : जमावबंदी असताना ‘मी पण गांधी’ रॅली काढणार्‍या इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात…

Share

मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांनी आज मुंबईत फॅशन स्ट्रीटपासून ते मंत्रालयापर्यंत ‘मी पण गांधी’ पदयात्रेला (Mi pan Gandhi) सुरुवात केली. मात्र, या दरम्यान त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी ही अडवणूक केली मात्र इंडिया आघाडीचे नेते याला न जुमानता आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमुळे मंत्रालय परिसरात अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक गाड्या अडून राहिल्या आहेत व ट्राफिक जाम झाले आहे. मेट्रो सिनेमा – फॅशन स्ट्रीट – हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. मात्र जमावबंदीच्या कारणास्तव रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं.

पोलिसांच्या या म्हणण्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या रॅली पुढे नेणारच अशी आक्रमक भूमिका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

2 hours ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

10 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

10 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

11 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

11 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

12 hours ago