INDIA Alliance : जमावबंदी असताना 'मी पण गांधी' रॅली काढणार्‍या इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात...

मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांनी आज मुंबईत फॅशन स्ट्रीटपासून ते मंत्रालयापर्यंत 'मी पण गांधी' पदयात्रेला (Mi pan Gandhi) सुरुवात केली. मात्र, या दरम्यान त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी ही अडवणूक केली मात्र इंडिया आघाडीचे नेते याला न जुमानता आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमुळे मंत्रालय परिसरात अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक गाड्या अडून राहिल्या आहेत व ट्राफिक जाम झाले आहे. मेट्रो सिनेमा - फॅशन स्ट्रीट - हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. मात्र जमावबंदीच्या कारणास्तव रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं.


पोलिसांच्या या म्हणण्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या रॅली पुढे नेणारच अशी आक्रमक भूमिका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन