सध्या एकच नाव, सर्वांना हाय ठाव… ते म्हणजे, सबसे कातील गौतमी पाटील. आपल्या आगळ्यावेगळ्या भन्नाट आणि घायाळ करणाऱ्या नृत्य-अदाकारीने गौतमीने जणू सर्वांनाच वेड लावले आहे. ती आता रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली असून गौतमीचा ‘घुंगरू एक संघर्ष’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे अगणित चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या ‘घुंगरू’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच त्याची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या कातील नृत्य अदांनी गौतमीने तरुणाईला घायाळ केले आहे. या गौतमीला रुपेरी पडद्यावर डोळे भरून पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून गौतमीसाठी हा सिनेमा खूपच खास आहे. ‘घुंगरू’त प्रेक्षकांना लोककलावंतांचे खडतर आयुष्य, त्यांचा संघर्ष, प्रेमकथा, रहस्यमय बाबी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खूर्चीला बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल, असे म्हटले जात आहे. सिनेमाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गौतमीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या सिनेमात गौतमी आणि बाबा गायकवाड हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सोलापूर, माढा, हम्पीसह परदेशातही या सिनेमाचे शूटिंग झाले आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…