Gautami Patil : सबसे कातील... गौतमी पाटील येतेय ‘घुंगरू’ घेऊन...


  • ऐकलंत का! : दीपक परब


सध्या एकच नाव, सर्वांना हाय ठाव... ते म्हणजे, सबसे कातील गौतमी पाटील. आपल्या आगळ्यावेगळ्या भन्नाट आणि घायाळ करणाऱ्या नृत्य-अदाकारीने गौतमीने जणू सर्वांनाच वेड लावले आहे. ती आता रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली असून गौतमीचा ‘घुंगरू एक संघर्ष’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे अगणित चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या ‘घुंगरू’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच त्याची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या कातील नृत्य अदांनी गौतमीने तरुणाईला घायाळ केले आहे. या गौतमीला रुपेरी पडद्यावर डोळे भरून पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून गौतमीसाठी हा सिनेमा खूपच खास आहे. ‘घुंगरू’त प्रेक्षकांना लोककलावंतांचे खडतर आयुष्य, त्यांचा संघर्ष, प्रेमकथा, रहस्यमय बाबी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खूर्चीला बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल, असे म्हटले जात आहे. सिनेमाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गौतमीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या सिनेमात गौतमी आणि बाबा गायकवाड हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सोलापूर, माढा, हम्पीसह परदेशातही या सिनेमाचे शूटिंग झाले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,